कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट टाकल्याप्रकरणी भारत सरकारने धडक मोहीम हाती घेतली आहे. या पोस्ट टाकणारी 1,178 पाक-खलिस्तानी अकाऊंट काढून टाकण्याचे आदेश भारत सरकारने ट्विटरला दिले होते. या आदेशाबाबत आता ट्विटरने भारत सरकारला प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हटले आहे टि्वटरने?
Also Read this: दुःखद बातमी! राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
भारत सरकारककडून नॉन-कंप्लायंस नोटिस प्राप्त झाली असून आम्ही भारत सरकारशी संपर्कात आहोत, असे ट्विटरच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. आमच्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. माहितीच्या देवाणघेवाणीचा जागतिक सकारात्मक स्तरावर परिणाम होतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे. तसेच ट्विट्स प्रवाहही सुरु राहिला पाहिजे. अशा तक्रारींबाबत आम्ही ती योग्य ती कारवाई करतो. मात्र त्याबरोरच सार्वजनिक संभाषण आणि मूलभूत तत्त्वांच्या सुरक्षेबाबत वचनबद्धता कायम राहिल हे ही सुनिश्चित करतो, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.