Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमी'आजच्या लेखकांनी मूग गिळून स्वस्थ बसू नका; लिहिते व्हा'- दामोदर मावजो

‘आजच्या लेखकांनी मूग गिळून स्वस्थ बसू नका; लिहिते व्हा’- दामोदर मावजो

आजच्या लेखकांनी मूग गिळून स्वस्थ बसण्याची वृत्ती अंगी बाळगू नये. ही वृत्ती स्वतःच्या स्वास्थसाठी योग्य असेल. मात्र समाजाच्या स्वास्थ्यासाठी योग्य नाही, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठाकार दामोदर मावजो यांनी दिला. फायटर झाल्याशिवाय रायटर होऊ शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

डॉ. डी. वाय. विद्यापीठ वतीने आयोजित डॉ. पी. डी. पाटील (स्वागताध्यक्ष ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-पिंपरी-चिंचवड २०१६ आणि १८वे जागतिक मराठी संमेलन २०२३) यांच्या संकल्पनेतून ८९व्या मराठी साहित्य संमेलनावर आधारित तसेच जागतिक मराठी संमेलनावर आधारित ‘साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा २०२३’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन शुक्रवारी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठाकार दामोदर मावजो (गोवा) यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे होते. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे व माजी कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप, विद्यापीठाच्या विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ग्रंथांच्या प्रकाशनासह ई-बुक तसेच संमेलनांच्या यू-ट्यूब चैनल्सचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच अमळनेर येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचा सपत्नीक विशेष सत्कार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

दामोदर मावजो म्हणाले, भाषा ही एकमेकांशी जोडणारी आहे. कोकणी आणि मराठी भाषा अद्वैत आहे. बहुभाषिक संस्कृती पुढे नेण्यासाठी मराठी आणि कोकणी भाषेचे संमेलन घेण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. डॉ. पी. डी. पाटील यांनी संमेलनाच्या नियोजन यशस्वीपणे पार पाडले. 89 साहित्य संमेलनात साहित्य मंथन केले. या मंथनातून संचित अमृतकुंभ निर्माण केले. त्यांचे हे अमृतकुंभ मी सेवन केलेच या पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरणार आहे. शिक्षण आणि साहित्य याचा फार घनिष्ठ संबंध आहे याचा मिलाफ पाटील यांनी घडवून आणला आहे. महाविद्यालयीन शिक्षणात साहित्य हा विषय अनिवार्य केला पाहिजे, असेही यावेळी त्यांनी अपेक्षा केली. सध्या तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे, या विकसीत तंत्रज्ञानाची सांगड घालून नवीन पिढीसमोर मांडायला हवे. तरुण पिढीला आवडेल आशा साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. समाजात जे बदल होत आहेत ते प्रतिबिंबित झाले पाहिजे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रात्रंदिवस काम केले. आजही हे संमेलन काल परवा झाला असे वाटते. हा मिळालेला साहित्याचा आनंद विसरू शकत नाही. डॉ. पी. डी. पाटील यांनी ऐतिहासिक काम केले आहे. समाजाला भरभरून देण्याचे काम पाटील आजही त्याच उत्साहाने करीत आहे. समाजाचे देने म्हणून त्यांनी साहित्यावर प्रचंड खर्च केला आहे. समाज सुधारला पाहिजे. अंधश्रद्धेकडे न जाता नवविचारकडे वळण्यासाठी काम केले आहे, असे कौतुक पाटील यांचे केले.

रामदास फुटाणे म्हणाले, साहित्य संमेलनाला कायम जिवंत ठवण्याचे काम आजच्या प्रकाशनाच्या ग्रंथामुळे झाले. या ग्रंथामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल. साहित्य संमेलन हा उरूस होऊ नये. तरुणांना जगण्याची दिशा मिळाली पाहिजे. शिक्षण संस्था मध्ये संमेलन झाले पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.रविंद शोभणे म्हणाले, मराठी साहित्य संमेलनाची परंपरा शतकाकडे चालली आहे. सामान्यांना प्रश्न विचारण्याचे बळ साहित्यिक देत असतो. लेखक समाजाचा घटक
असून त्यांच्या उन्नतीसाठी झटत असतो. साहित्य हा समाजाचा आरसा नसून उद्गार आहे.

रमाकांत खलप म्हणाले, साहित्य संमेलनांचे शिवधनुष्य उचलण्याचे काम पाटील यांनी यशस्वीपणे केले आहे. आता यापुढे…

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments