Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीकथा ही परिणाम साधाणारी असावी-डॉ सुभाष आहेर मसाप चा मराठी भाषा पंधरवडा

कथा ही परिणाम साधाणारी असावी-डॉ सुभाष आहेर मसाप चा मराठी भाषा पंधरवडा

२५ जानेवारी २०२१,
साहित्यात समाजातील माणसांचे चित्रण असते म्हणून साहित्याला समाजाचा आरसा म्हणतात. कथा हा अनुभवाचा भाग आहे.अनुभवाने सिध्द झालेली कथा परिणाम कारक ठरते. कथेचा हेतू हा केवळ मनोरंजन नसून उदबोधनही आहे. कथेमध्ये वर्णन शैली महत्वाची असते. कथा ही परिणाम साधणारी असेल तर यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे विचार डॉ.सुभाष आहेर यांनी मांडले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित कथाकथन व कथावाचन या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनीता ऐनापुरे उपस्थित होते.मसाप च्या मराठी भाषा पंधरवडा अंतर्गत घेण्यात आलेल्या कथाकथन या उपक्रमात डॉ. रजनी शेठ, डॉ.राजेन्द्र कान्करिया आणि राज अहिरराव सहभागी झाले. विज्ञानाची जोड असलेली ‘अचानक ‘ ही कथा, शेठ यांनी सादर केली. विनोदी अंग असलेली ” राम राम गंगाराम ” ही कथा, कान्करिया यांनी आपल्या शैलीत सादर केली तर ग्रामीण बाज असलेली “जित्याची खोड ” ही कथा अहिरराव यांनी सादर केली.

सदर कार्यक्रमास संभाजी बारणे, जयश्री श्रीखंडे, डी.बी.शिंदे, अपर्णा गोवंड़े, बाबू डिसोझा, नंदकुमार कांबळे, डॉ. समिता टिल्लू, संजय होनकळस, माधुरी डिसोझा, श्रीकांत जोशी, सुभाष चव्हाण, मंगला पाटसकर, बाळासाहेब रामटेके, श्यामल पण्डित व इतर रसिक उपस्थित होते. ऐनापुरे यानी प्रास्तविक केले. माधुरी मंगरूळकर यांनी सुत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments