गेल्या ११ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद करण्यात आला. यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने वकिलांनी जोरकसपणे बाजू मांडली. या निकालावर राज्यातल्या शिंदे सरकारच्या भवितव्यावरही या निर्णयाचा परिणाम होणार असल्यामुळे त्याच्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ न्यायालयासनावर स्थानापन्न होतील….
त्यानंतर प्रथम दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणाचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होईल…
इथे पहा लाइव्ह