शहरात तहसील कार्यालयात तहसीलदाराची कर्तव्य असलेली कामकाजाचा कारभार प्रत्यक्षात कोतवाल करत असल्याचे बोलले जात आहे, शहरातील तहसील कार्यालयात गोडबंगाल होत असून यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. शहरातील तहसिल कार्यालयात कोणत्या फाईली लवकर होणार मंजूर , कोणत्या फाईली निकाली लागणार , कोणती कामे होणार हे सर्व आता हा कोतवाल मोठ्या धाडसाने बोलून व करून दाखवत आहे.
गावांत विविध सरकारी आदेश पोहचविणे, दवंडी पिटवणे, तलाठी कार्यालयातील कामे करणे, यांसारख्या कामांसाठी महसूल विभागात अनेक वर्षांपासून कोतवाल हे पद अस्तित्वात आहे. तलाठ्यांचे सेवक म्हणून खेडोपाड्यात जावून काम करण्यासाठी कोतवालपदाची निर्मिती करण्यात आली. नेमून दिलेल्या तलाठी कार्यालयाच्या क्षेत्रात त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या मर्जीतील बनून अधिकाऱ्यांसाठी पाहिजे ते काम हे कोतवाल करतात.
हा कोतवाल तहसील मधील इतर कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडचणी निर्माण करत असून वरिष्ठ अधिकारी माझ्या मर्जीतले आहे अशी आहे बतावणी करत आहे. अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एकाने दिली आहे. कोतवाल पदावरील कर्मचाऱ्यांना त्याच्या गावातील तलाठी सजा कार्यालयावरच ठेवून त्यांच्याकडून गाव पातळीवरची कामे करून घ्यावी असा शासनाचे वरिष्ठ अधिकारी मुख्य सचिव यांचे स्पष्ट आदेश असताना सुध्दा सदर कोतवाल हा तहसील कार्यालयात स्वतंत्र कॉम्प्युटर डेक्स घेऊन काम करत असतानाचे चित्र दिसत आहे. हे काम शासन आदेश विरोधी असून हा कोतवाल मात्र बिनदिक्कतपणे काम करत आहे.
यावरून तो कोतवाल खरच तहसीलदार यांच्या मर्जीतला आहे असे का ..? तसेच हा कोतवाल असून संपूर्ण तहसील कार्यालय हाच चालवतो का ..असे कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांत चर्चा चालू आहे.