Tuesday, February 18, 2025
Home Blog

दसरा-दिवाळी स्पेशल – आजपासून ४० दिवसांसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष ट्रेन्स

२० ऑक्टोबर २०२०,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आजपसान ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांअगोदरच सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. शिवाय, या ट्रेनना फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे नाव देखील देण्यात आले आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या ट्रेन्स धावणार आहेत.

रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ट्रेन कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे.

सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या, मात्र एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते की, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील. तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते. त्यानुसार आता ३९२ विेशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. रेल्वेकडून या विशेष ट्रेन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंगचे न पालन करणे महागात पडू शकते. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास रेल्वेकडून दंड आकारला जाऊ शकतो.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

सद्यस्थितीस एकूण ६६६ मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू आहेत. तर, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमीत ट्रेन्स

दसरा-दिवाळी स्पेशल : आजपासून ४० दिवसांसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष ट्रेन्स
२० ऑक्टोबर २०२०,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आजपसान ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांअगोदरच सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. शिवाय, या ट्रेनना फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे नाव देखील देण्यात आले आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या ट्रेन्स धावणार आहेत.

रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ट्रेन कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे.

सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या, मात्र एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते की, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील. तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते. त्यानुसार आता ३९२ विेशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. रेल्वेकडून या विशेष ट्रेन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंगचे न पालन करणे महागात पडू शकते. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास रेल्वेकडून दंड आकारला जाऊ शकतो.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

सद्यस्थितीस एकूण ६६६ मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू आहेत. तर, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमीत ट्रेन्स अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड सन्मान २०२५ पुरस्कारांची घोषणा, २२ फेब्रुवारीला पार पडणार सन्मान सोहळा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

शहराच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा News14 Media Network सातत्याने जपते आहे. यावर्षीही ‘पिंपरी चिंचवड सन्मान २०२५’ पुरस्कारांचे मानकरी जाहीर करण्यात आले असून, ११ कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे. हा भव्य सोहळा २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ७ वाजता ASM Group च्या CSIT पिंपरी येथील सभागृहात पार पडणार आहे.

पुरस्कार विजेते:

१) मा.श्री सोपानराव खुडे – जेष्ठ साहित्यिक

2) मा.श्री. प्रविण तुपे – प्रशासकीय सांस्कृतिक

3) मा.श्री. बाळासाहेब गायकवाड – बांधकाम व्यावसायिक

4) मा. डॉ. प्रकाश कोयाडे – कादंबरी लेखक

5) मा.श्री. मिलिंद कांबळे – पत्रकार

6) कु. प्रियंका इंगळे – खो-खो खेळाडू (भारत कॅप्टन)

7) मा.श्री. देवदत्त कशाळीकर – प्रसिद्ध फोटोग्राफर

8) मा.श्री. पंकज सोनवणे – VFX प्रोड्युसर

9) मा.श्री. वसंत गुजर – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते

10) श्रीमती आशा पांचपांडे – शैक्षणिक (जीवन गौरव)

11) इन अथलेटिक सोसायटी – सामाजिक संस्था

विशेष सन्मान:

यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवणाऱ्या ‘सुलतान’ या लघुपटाच्या संपूर्ण टीमचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

प्रमुख उपस्थित मान्यवर:

कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते मा. मुरलीकांत पेटकर असतील. तसेच, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले, पुणे महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखरसिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मावळचे खासदार संसदरत्न मा. श्रीरंग आप्पा बारणे, खासदार अमोल कोल्हे, आमदार शंकरभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, आण्णा बनसोडे, उमाताई खापरे आणि अमित गोरखे यांची उपस्थिती लाभणार आहे.

सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन

News14 Media Network चे संचालक व संपादक अविनाश कांबीकर यांनी शहरवासीयांना या गौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम समाजाच्या विविध स्तरांतील योगदानशील व्यक्तींना प्रोत्साहन देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महानगरपालिकेच्या वतीने ” शिवशंभू शौर्यगाथा ” या भव्य महानाट्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत शहरातील वेगवेगळ्या पाच ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रबोधन पर्वात ‘शिवशंभू शौर्यगाथा’ या भव्य महानाट्यासह ‘शाहिरीतून शिवदर्शन’, ‘सन्मान शिवरायांचा- रंग शाहिरी कलेचा’, ‘काव्यमय समाज प्रबोधन’, विविध विषयांवर व्याख्याने, ‘ढोल पथक वादन’, ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या जीवनावर आधारित शाहिरी’, ‘जागर शिवचरित्राचा’ यांसह शालेय विद्यार्थ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर आधारित निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा,रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधनपर्व साजरे करीत असते. यानिमित्त यंदाही महापालिकेच्या वतीने  विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्प उद्यान येथे होणार आहे.

 या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमूख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी,सुनेत्रा पवार,सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे,डाॅ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे,माजी नगरसदस्य,नगरसदस्या,महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,विजयकुमार खोराटे,चंद्रकांत इंदलकर यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक,शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

भक्ती शक्ती चौक निगडी येथील कार्यक्रम…

निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान येथे हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ‘शाहिरीतून शिवदर्शन’ हा पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम शाहीर रामानंद उगले व त्यांचे सहकारी सादर करतील तर, रात्री ८ वाजता ‘असे होते छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर शिवव्याख्याते नितिन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच रविवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘सन्मान शिवरायांचा-रंग शाहिरी कलेचा’ हा शाहीर जळगाव येथील समाजभूषण शाहीर शिवाजीराव पाटील यांचा कार्यक्रम तर रात्री ८ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्याते उद्धव शेरे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. 

नियोजीत महापौर निवास, अ प्रभागाजवळ, निगडी येथील कार्यक्रम…

पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी आशिया खंडातील गाजलेले भव्य महानाट्य…  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आशियाखंडातील नामांकित ३०० कलाकारांचे उंट, घोडे, आदींसह दोन मजली रंगमंचावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवशंभू शौर्यगाथा’ हे भव्य महानाट्य  शहरवासीयांसाठी आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी याकाळात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत होणार  आहे. प्रविण देशमुख व त्यांचे सहकारी या नाटकाचे सादरीकरण करणार आहेत. 

चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रम…

छत्रपती संभाजीनगर, चिंचवड येथील कमलनयन बजाज शाळेजवळ १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘काव्यमय समाज प्रबोधन’ हा कार्यक्रम होणार असून त्याचे सादरीकरण सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत (अकोला) व त्यांचे सहकारी करणार आहेत. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘आदर्श राजे-छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर शिवचरित्रकार आकाश भोंडवे यांचे व्याख्यान, १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध कवी-गायक,व्याख्याते संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम होणार आहे. तर येथील कार्यक्रमाचा समारोप १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘ढोल पथक सादरीकरण ’ कार्यक्रमाने होणार आहे. 

डांगे चौक,थेरगाव येथे होणारे कार्यक्रम…

चिंचवड येथील डांगे चौक येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज शिल्प उद्यान येथे १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर आधारित शाहिरीचा भव्य कार्यक्रम होणार असून १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन’ या विषयावर व्याख्याते दस्तगीर अझीज काझी यांचे व्याख्यान होणार आहे तर कार्यक्रमाचा समारोप १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘जागर शिवचरित्राचा’ या विषयावर कोल्हापूर येथील शिवव्याख्याते तात्यासाहेब मोरे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.

एच.ए.कॉलनी,पिंपरी येथे व्याख्यान…

पिंपरी येथील एच.ए.कॉलनी येथे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता रायगड येथील शिवव्याख्याते अँड. मारूती बबन गोळे (रायगड) यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान होणार आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन हे सर्वांसाठी प्रेरणादायीआहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२५’ महोत्सव आयोजित केला असून सर्वांना विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमांना शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेखर सिंह आयुक्त तथा प्रशासक यांनी केले आहे

उद्योजकांनी वेगळ्या वाटा निवडाव्या – विनोद जाधव

पीसीईटी कडून लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड प्रदान

शिक्षण आणि जिज्ञासा ही सदासर्वकाळ माणसाच्या सोबत असते. आपण जिथे शिक्षण घेतो अथवा काम करतो तिथे आपली जिज्ञासा कायम ठेवली तर, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जागतिक बाजारपेठेत विकसित आणि विकसनशील देशात अनेक उद्योगात खूप चांगल्या संधी उद्योजकांची वाट पाहत आहेत. भारतीय तरुण उद्योजकांनी व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी जगभरात उपलब्ध असलेल्या या संधीचा फायदा घेऊन आपला उत्कर्ष साधून घ्यावा असे मार्गदर्शन दुबई येथील उद्योजक सावा हेल्थकेअरचे विनोद जाधव यांनी केले. 

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने आकुर्डी येथील शैक्षणिक संकुलात विनोद जाधव यांना पीसीईटीचा लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पोर्टफोलिओ व्यवस्थापन तज्ञ डॉ. मकरंद जावडेकर उपस्थित होते. यावेळी ग्लोबल आंत्रप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह २०२५ चे निमंत्रक सचिन इटकर यांनी विनोद जाधव यांच्याशी खुला संवाद साधला. यावेळी जाधव यांनी सांगितले की, मी स्वतः इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा करून, १३ वर्षे नोकरी करून वेगळ्या फार्मसी सेक्टर मध्ये सक्षमपणे काम करत आहे, तर तुम्हालाही काही अशक्य नाही. 

कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्रास्ताविकात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ची आतापर्यंत ची यशस्वी वाटचाल सांगितली. पीसीईटीने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून प्लेसमेंट बरोबर उद्योजक तयार करण्यासाठी विशेष सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उपस्थित विद्यार्थी आणि उद्योजकांनी विनोद जाधव यांना प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ग्लोबल फार्मसी मार्केट, आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक कायदे यांच्याबद्दल जाणून घेतले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर यांनी विनोद जाधव यांना पीसीईटीचा लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड मिळाल्याबद्दल जाधव यांचे अभिनंदन केले.

आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा

भोसरी,चिंचवडच्या तुलनेत पिंपरीला बजेटमध्ये निधी देण्याची माजी नगरसेवकांनी केली मागणी

पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेशी सबंधित पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा आमदार अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याक़डून गुरुवारी (ता.१३) घेतला. महापालिका अधिकारी आणि पिंपरी मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी माजी नगरसेवकांनी भोसरी, चिंचवडच्या तुलनेत पिंपरीला महापालिकेच्याा आगामी अर्थसंकल्पात निधी देण्याची मागणी केली.विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर आ.गोरखे यांनी पिंपरीची अशी ही पहिलीच बैठक घेतली.

महापालिका निवडणूक झाली नसल्याने गेले ३५ महिने महापालिकेत प्रशासक राज आहे.त्यामुळे नागरी प्रश्न तातडीने सुटत नसून विकासकामेही प्रलंबित आहे. त्यासाठी आ.गोरखेंनी ही बैठक घेतली.शहरातील दुसऱ्या विधान परिषद सदस्य उमा खापरे या परदेशात असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत. तिचे वैशिष्ट म्हणजे वॉर्ड  तथा प्रभागनिहाय प्रलंबित समस्या त्यात मांडण्यात आल्या.त्यातील शक्य त्या लगेच सोडवतो असे आश्वासन आयुक्तांनी दिले.माजी नगरसेवक शीतल शिंदे,राजेश पिल्ले,राजू दुर्गे,संदीप वाघेरे,चेतन घुले,शैलेश मोरे,अनुराधा गोरखे,सुजाता पलांडे,शर्मिला बाबर,कुणाल लांडगे, कैलास कुटे,गणेश लंगोटे,आऱ.एस.कुमार,राजेंद्र बाबर,प्रदीप भोसले आदी यावेळी उपस्थित होते्.या सर्वांनी भोसरी,चिंचवडच्या तुलनेत पिंपरीला बजेटमध्ये निधी देण्याची एकमुखी मागणी केली.

ज्येष्ठ माजी नगरसेवक आर.एस.कुमार यांनी निगडी-प्राधिकरणात भेडसावणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाकडे यावेळी लक्ष वेधले,प्राधिकरणातील वाहतूक कोंडीचाही मुद्दा मांडला. उद्यानांची देखभाल होत नसल्याचे सांगत महापालिकेची क्षेत्रीय़ कार्यालय इमारत अपुरी पडते आहे,असे बाबर म्हणाले. वाघेरे यांनी बजेटमध्ये आपल्या प्रभागासह पिंपरी गावासाठी निधी देण्याची मागणी केली.पिंपरी कॅम्प या शहराच्या बाजारपेठेतील व्य़ापाऱ्यांना वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले.झोप़डपट्टी पुनर्वसनाचे (एसआरए) काम नीट होत नसल्याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.श्रीमती गोरखे यांनी शाहूनगर येथे पडून असलेल्या अडीच एकरच्या भुखंडावर नाट्यगृह उभारण्याची मागणी केली.त्यांनी सुद्धा वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित केला.संत तुकारामनगर येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या कामाला वेग द्या,असे पालांडे म्हणाल्या.वल्लभनगर एसटी आगाराशेजारचा मोकळा भुखंड विकसित करा,अशी सूचना त्यांनी केली.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल पिल्ले यांनी खंत व्यक्त केली.ती सक्षम करण्यासाठी पीएमपएमलच्या ताफ्यात बसची संख्या वाढली पाहिजे,असे ते म्हणाले.बोपखेलवासियांच्या सोईसाठी बांधण्यात आलेल्या नव्या पुलावर दिशादर्शक फलक नसल्याने तिकडे जाणारी नव्या व्यक्तींचा गोंधळ होत आहे. त्यामुळे हे फलक तातडीने लावावेत,अशी मागणी घुले यांनी केली.दुर्गे यांनी पाणी,रस्ते हे प्रश्न मांडले.तर,बीआरटीमुळे रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी तसेच पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याकडे मोरे यांनी लक्ष वेधले.अनधिकृत पार्किंगच्या मो्ठ्या समस्येकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे तसेच बीआरटीमुळे रस्ता रुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगितले.पादचाऱ्यांची सुद्धा रस्ता अरुंद झाल्याने गैरसोय होत आहे,असे ते म्हणाले.

अनधिकृत पार्क केलेल्या वाहनांच्या गराड्यातून पादचाऱ्यांना मार्ग काढावा लागतो,जीव धोक्यात घालून रस्त्यातून चालावे लागते,असे ते म्हणाले.येत्या काही दिवसांत सादर होणाऱ्या महापालिका बजेटमध्ये आपला प्रभागच नाही,तर आपल्या पिंपरी मतदारसंघालाही भरीव निधी देण्याची मागणी केली. पिंपरीतील प्रलंबित प्रश्न तथा विकासकामांचा आढावा नियमितपणे घेतला जाणार असल्याचे आ. गोरखे यांनी या बैठकीनंतर सांगितले.

कुदळवाडी येथील ४६५ एकर जमिनीवरील अतिक्रमण विरोधी महापालिकेची कारवाई 

चिखली येथील कुदळवाडी भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या मोहिमेअंतर्गत आज अखेरपर्यंत २०२ लाख २९ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेली २ हजार ८४५ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान ४६५ एकर भूभागावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ फेब्रुवारी २०२५ पासून कुदळवाडी येथे अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने आणि इतर अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. आज मोहिमेच्या पाचव्या दिवशी, सुमारे ९३ एकर भूभागावर पसरलेल्या ४० लाख ५७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या ५२८ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 

आजच्या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, महेश वाघमोडे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर निष्कासनासाठी करण्यात आला. तसेच महापालिकेचे ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस कर्मचारी आणि मजूर यांचा देखील यामध्ये समावेश होता. सुरक्षेसाठी ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.

महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेतून कुदळवाडी येथे नियोजित विकास आरक्षणे आणि नागरी सुविधा जागेवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे. – प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

लहुवंदना पाठांतर स्पर्धेस ६७० स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १६ फेब्रुवारीला होणार बक्षिस वितरण समारंभ

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंग यांच्या वतीने ०१ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ या दरम्यान भव्य लहुवंदना पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत शालेय व शाळाबाह्य अशा एकूण ६७० स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आला आहे.

‘सैराट’फेम सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा आणी पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र शासन आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अशोक लोखंडे, महाराष्ट्र शाहीर परिषद अध्यक्ष प्रकाश ढवळे, चित्रपटलेखक संजय नवगिरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंगचे अध्यक्ष अनिल सौंदडे, सचिव महेश खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून यावेळेस इतिहासाचे अभ्यासक प्रा. अंबादास सकट आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कुलकर्णी यांची व्याख्याने होणार आहेत.

सहभागी स्पर्धक आणि शहरातील नागरिक यांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने शाहीर आसराम कसबे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रावेत प्रकल्पातील विजेत्या लाभार्थ्यांना मिळणार किवळे येथे सदनिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका करणार ७५५ सदनिकांचे हस्तांतरण

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रावेत प्रकल्पातील९३४ सदनिकांकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने सोडत काढली होती. परंतु महानगरपालिकेकडून रावेत येथील प्रकल्प रद्द करण्यात आला होता. मात्र आता रावेत प्रकल्पातील निवड झालेल्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत प्राप्त होणाऱ्या किवळे येथील सदनिका देण्याचे नियोजन आहे. या एका सदनिकेची किंमत १३ लाख ७१८ रुपये असून या दरामध्ये ज्या लाभार्थ्यांना लाभ घ्यावयचा आहे, त्या लाभार्थ्यांनी संमतीपत्र महानगरपालिकेकडे १५ मार्च २०२५ पर्यंत सादर करावे,  असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. 

किवळे येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ७५५ सदनिका उभारण्यात येत आहेत. या सदनिका आता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रावेत प्रकल्पातील निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. या ७५५ सदनिकांपैकी ३७८ सदनिका सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना, २२६ सदनिका इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांना, ९८ सदनिका अनुसुचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना, ५३ सदनिका अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. एकूण ७५५ सदनिकांपैकी ३८ सदनिका या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. 

रावेत प्रकल्पातील लाभार्थी हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणानुसार संमतीपत्र देऊन या सदनिकांचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाकडे संमतीपत्र सादर करावे. या संमतीपत्राचा मसुदा लाभार्थ्यांनी चिंचवडगांव येथील चाफेकर चौकात असणाऱ्या उप आयुक्त, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या कार्यालयातून घ्यावा, व आवश्यक माहिती भरून सादर करावा. लाभार्थ्यांना सदनिकांचा लाभ घेताना संमतीपत्रासोबत आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निकष पुर्तता करणाऱ्या अर्जदारांनाच किवळे प्रकल्पातील सदनिका वाटप करण्यात येणार आहेत. याशिवाय सदनिका हस्तांतरणाबाबतची प्रक्रियेमध्ये बदल करणे, या प्रक्रियेला स्थगिती देणे अथवा रद्द करण्याचे अधिकार महानगरपालिकेने राखून ठेवले आहेत. 

संमतीपत्रासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे

– आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक उत्पन्न तीन लाख पर्यंतचा उत्पन्न दाखला (तहसीलदार पिंपरी चिंचवड / हवेली / मुळशी यांचे स्वाक्षरीने  किंवा १ वर्षाचा आयकर परतावा किंवा फॉर्म १६/१६अ)

– अर्जदाराचे जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.भ.ज., इतर मागासवर्गीय). अर्जदाराच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. 

– अर्जदाराचे जात वैधता प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास)

– अर्जदार व कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड  (पिंपरी चिंचवड शहरातील)

– अर्जदार व सह अर्जदार यांचे पॅनकार्ड 

– अर्जदाराचे बँक पासबुक छायांकीत प्रत, पासबुक खाते तपशिल पृष्ठ, रद्द केलेला धनादेश

– अर्जदाराचे मतदान ओळखपत्र (पिंपरी चिंचवड शहरातील)

– भाडे करार (नोंदणीकृत / नोटरी – किमान र.रु.५००/- च्या स्टॅम्प पेपरवर)

– संमतीपत्र ( पिंपरी चिंचवड शहरातील नातेवाईकांकडे राहत असल्यास त्यांचे किमान र.रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र)

– वीज बिल (चालु महिन्याचे राहत्या पत्त्यावरील) – पिंपरी चिंचवड शहरातील

– अधिवास प्रमाणपत्र (फक्त महाराष्ट्रातील रहिवासी)

– दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

किवळे येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या ७५५ सदनिका महानगरपालिकेकडे उपलब्ध होणार आहेत. या सदनिका आता रद्द झालेल्या रावेत प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन असून एका सदनिकेची किंमत १३ लाख ७१८ रुपये इतकी आहे. ज्या लाभार्थ्यांना या दरामध्ये लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी संमतीपत्र सादर केल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार वितरण करण्याचे नियोजन आहे.  

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

माजी मंत्री तानाजी सावंताचा मुलगा , यामुळे न सांगताच बँकॉक निघून चालला होता..? 

माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा सोमवारी दुपारीपासून बेपत्ता झाला होता. त्यासंदर्भात पुण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तो मित्रांसोबत खासगी विमानाने बँकॉकला गेल्याचे स्पष्ट झाले. रात्री ९ वाजेच्या सुमारास तो परत आला. आता या सर्व प्रकरणावर ऋषीराज सावंत याचे बंधू गिरीराज सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीराज सावंत यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी ३.३० वाजता ऋषीराजचा मेसेज आला. तो दोन दिवस बाहेर जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याने फोन स्विचऑफ केला. आम्हाला तो कुठे गेला? कोणाबरोबर गेला? कशासाठी गेला? त्याची काहीच माहिती नव्हती. वडील या नात्याने तानाजी सांवत चिंताग्रस्त झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. घरात आम्ही रोज कोण कुठे असणार आहे, त्याची माहिती देत असतो. न सांगता कोणीच कुठे जात नाही, असेही गिरीराज सावंत यांनी म्हटले.

दरम्यान ऋषिराज सावंत पुण्यातुन बॅंकॉकला जायला निघाला. मात्र तानाजी सावंतांनी त्यांच्या राजकीय संबंधांचा वापर करुन त्याला परत आणायच ठरवलं . केंद्रीय नागरी उड्डयण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यामध्ये महत्वाची भुमिका निभावली, अशी माहिती समोर आली आहे. 

बॅंकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहचलो-

मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर मंत्रालयाकडून तातडीने सुत्रे हलली आणि पायलटला माघारी फीरण्याचे आदेश देण्यात आले. तोपर्यंत बंगालच्या उपसागरावर पोहचलेलं ऋषिराज सावंतचं खाजगी विमानने मग हवेतुनच युटर्न घेतला. विमान जेव्हा लॅंड झालं तेव्हा ऋषिराज सावंत कळालं की, आपण बॅंकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहचलो आहोत. दरम्यान, ऋषिराज सावंतसोबत कोण कोण खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकसाठी निघालेलं याची माहिती समोर आली आहे. ऋषिराज सावंतसोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे दोन मित्र खाजगी विमानात होते. 

यामुळे न सांगता गेला?

आठ दिवसांपूर्वी ऋषीराज दुबईत व्यावसायिक कामासाठी गेला होता. त्यानंतर आता पुन्हा व्यावसायिक कारणासाठी तो बँकॉकला जात होतो. दुबईला आठ दिवस थांबल्यानंतर बँकॉकला कोणी जावू देणार नाही, असे त्याला वाटले. त्यामुळे भीतीपोटी घरात न सांगता तो गेला. मी दोन दिवस बाहेर जात आहे, असे सांगून  त्याने फोन बंद केला होता. त्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झालो होतो, असे गिरीराज सावंत यांनी म्हटले.

अनधिकृत आरएमसी प्लांट त्वरित बंद करण्यात यावेत – आमदार शंकर जगताप

शहरातील अनधिकृत रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्समुळे वाढत्या हवा आणि ध्वनी प्रदूषणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पर्यावरण विभागाची परवानगी न घेता हे प्लांट सुरू असल्याने श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन अशा अनधिकृत प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्याची आणि ते त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे.

चिंचवड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू असून, बांधकामांसाठी रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्स वापरले जात आहेत.  त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार शंकर जगताप यांनी ही मागणी केली आहे. 

आरएमसी प्लांट्समुळे सतत मोठ्या प्रमाणावर धूळ हवेत पसरत असल्याने नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच, हे प्लांट्स रात्रंदिवस सुरू असल्याने मोठ्या वाहनांची वर्दळ आणि मशीनच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून चालू असलेल्या या आरएमसी प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच परवानगीशिवाय चालणारी सर्व प्लांट्स तात्काळ बंद करण्यात यावीत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

चिखली – कुदळवाडी भागात सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरु 

चिखली येथील कुदळवाडी भागात आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर सलग दुसऱ्या दिवशी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि क्षेत्रीय धडक कारवाई पथकांमार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आज ६८ लाख ७८ हजार चौरस फूट बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सुमारे ६०७ बांधकामांचा समावेश होता.

महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या राबविलेल्या या कारवाईमध्ये पहिल्या दिवशी २२२ आणि आज दुसऱ्या दिवशी ६०७ बांधकामे निष्कासित करण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे,कार्यकारी अभियंता सुनिल बागवानी यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर  निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका देखील येथे तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झाले होते.

महापालिकेच्या आरक्षित जागेवर तसेच डिपी रस्त्यांवर असलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर ब्लॉकनिहाय अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे. यामध्ये ज्यांचे साहित्य किंवा मशिनरी असतील त्यांनी त्या तात्काळ काढून घेऊन  महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. – प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका