Thursday, May 15, 2025
Home Blog

दसरा-दिवाळी स्पेशल – आजपासून ४० दिवसांसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष ट्रेन्स

२० ऑक्टोबर २०२०,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आजपसान ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांअगोदरच सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. शिवाय, या ट्रेनना फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे नाव देखील देण्यात आले आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या ट्रेन्स धावणार आहेत.

रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ट्रेन कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे.

सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या, मात्र एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते की, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील. तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते. त्यानुसार आता ३९२ विेशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. रेल्वेकडून या विशेष ट्रेन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंगचे न पालन करणे महागात पडू शकते. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास रेल्वेकडून दंड आकारला जाऊ शकतो.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

सद्यस्थितीस एकूण ६६६ मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू आहेत. तर, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमीत ट्रेन्स

दसरा-दिवाळी स्पेशल : आजपासून ४० दिवसांसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष ट्रेन्स
२० ऑक्टोबर २०२०,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आजपसान ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांअगोदरच सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. शिवाय, या ट्रेनना फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे नाव देखील देण्यात आले आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या ट्रेन्स धावणार आहेत.

रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ट्रेन कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे.

सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या, मात्र एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते की, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील. तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते. त्यानुसार आता ३९२ विेशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. रेल्वेकडून या विशेष ट्रेन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंगचे न पालन करणे महागात पडू शकते. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास रेल्वेकडून दंड आकारला जाऊ शकतो.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

सद्यस्थितीस एकूण ६६६ मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू आहेत. तर, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमीत ट्रेन्स अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.

प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे निवडणूक आयोगाचे, राज्य सरकारला आदेश 

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

आयोगाने बुधवारी राज्य सरकारला पत्र पाठवून महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तातडीने सुरूकरण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गट आणि गण रचना करण्याचेहीनिर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून कोविड-१९, प्रभाग रचनेतील विलंब आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांमुळे या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. सध्या राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्याप्रशासकांमार्फत चालवल्या जात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांत निवडणुका जाहीर करण्याचे आणि चार महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशदिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने आवश्यक ती तयारी सुरू केली आहे.

ओबीसी आरक्षणासाठी बांठिया आयोगाच्या आधीची स्थिती ग्राह्य धरण्यात येणार असून, ओबीसी समाजासाठी पूर्ण आरक्षण लागू करण्यात येणार आहे. प्रभाग, गट आणि गण रचना झाल्यानंतर आरक्षण सोडत घेतली जाईल.

कुदळवाडी चिखली परिसरातील धार्मिक स्थळांवर लगेचच कारवाई नाही- प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंग 

कुदळवाडी चिखली परिसरात नोटीस दिलेल्या धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण कारवाई लगेचच करण्यात येणार नाही. सर्वोच्च न्यायालय तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने तसेच यासंदर्भामध्ये प्राप्त झालेल्या खुलाश्यांवर संपूर्ण सुनवणी प्रक्रिया पार पाडूनच पुढील कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंह यांनी आज मज्जिद और मदरसा ॲक्शन कमिटीच्या संयुक्त शिष्ट मंडळास दिले. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयुक्त शेखर सिंग यांच्या समवेत ॲक्शन कमिटीचे राहुल डंबाळे , फजल शेख , शहाबुद्दीन शेख , नियाज सिद्दीकी , बाबा कांबळे , गुलजार शेख , युसुफ कुरैशी , मौलाना नय्यर नुरी , कारी इक्बाल उस्मानी , सय्यद गुलाम रसुल , याकुब शेख , रशिद सय्यद , शकुरुल्ला पठाण , वाहीद कुरैशी , 

इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पोलीस उपायुक्त श्री शिवाजी पवार ,  सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. यावेळी नोटीस धारक मशिदींच्या प्रतिनिधींनी संपूर्ण हकीकत व्यक्त करत सर्व मशिदी या खाजगी जागेवर असून त्या राज्य शासनाच्या धोरणानुसार नियमित होण्यास पात्र असून तशी कार्यवाही आमच्याकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सदर धार्मिक स्थळे अधिकृत करून द्यावी अशी विनंती केली.

यावेळी राज्य शासनाने यापूर्वीच छत्रपती  , कोल्हापूर , मीरा-भाईंदर, मुंबई , नागपुर इत्यादी महानगरपालिका क्षेत्रांमधील हजारो धार्मिक स्थळे नियमित केल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेऊन जी धार्मिक स्थळे नियमानुकूल होणे शक्य असतील त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे देखील स्पष्ट आश्वासन आयुक्तांनी दिले. 

दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने धार्मिक स्थळांना कारवाईबाबत दिलेली नोटीस ही अत्यंत चुकीची असून इतर महापालिकांप्रमाणे धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी शिष्टमंडळातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान महानगरपालिकेने एकतर्फी कारवाई केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो अशी भीती देखील यावेळी व्यक्त केली गेली. दरम्यान सध्या भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहरांमध्ये अन्य कोणताही तनाव निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर ही कारवाई रद्द करावी अशी आग्रही विनंती करण्यात आली होती. 

दरम्यान नोटीस दिलेल्यां पैकी पाच मशिदींना छत्रपती संभाजी नगर  येथील वक्फ ट्रीब्युनल बोर्डाने कारवाई करण्यास मनपाला स्थगिती आदेश दिलेले आहेत.

दरम्यान धार्मिक स्थळे नियमातून करण्यासंदर्भामध्ये नोडल अधिकारी म्हणून शहर अभियंता मकरंद निकम यांचेशी संपर्क साधण्याबाबत शिष्टमंडळास आयुक्तांनी सांगितले आहे. 

न्यायमूर्ती भूषण गवई बनले भारताचे 52 वे सरन्यायाधीश राष्ट्रपतींनी दिली शपथ; कार्यकाळ केवळ 7 महिन्यांचा असणार 

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपला.

सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई यांचे नाव ज्येष्ठता यादीत होते. म्हणूनच न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यांचे नाव पुढे केले. त्यांचा कार्यकाळ फक्त ७ महिन्यांचा आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरील त्यांच्या प्रोफाइलनुसार, न्यायमूर्ती गवई यांना २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. त्यांची निवृत्ती तारीख २३ नोव्हेंबर २०२५ आहे.

न्यायमूर्ती गवई यांनी १९८५ मध्ये त्यांच्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली 

न्यायमूर्ती गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांनी १९८५ मध्ये त्यांच्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली. १९८७ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली. यापूर्वी त्यांनी माजी अॅडव्होकेट जनरल आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिवंगत राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले.

१९८७ ते १९९० पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती. १४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती. १२ नोव्हेंबर २००५ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले.

न्यायमूर्ती गवई हे दुसरे दलित सरन्यायाधीश असतील 

न्यायमूर्ती गवई हे देशातील दुसरे दलित सरन्यायाधीश असतील. त्यांच्या आधी न्यायमूर्ती केजी बालकृष्णन हे भारताचे सरन्यायाधीश झाले. २००७ मध्ये न्यायमूर्ती बालकृष्णन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती गवई यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामध्ये मोदी सरकारच्या २०१६ च्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणे आणि निवडणूक रोखे योजना असंवैधानिक घोषित करणे समाविष्ट आहे.

राज्यात भाजपा शहराध्यक्षांची नियुक्ती; पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड

पिंपरी-चिंचवड – भारतीय जनता पक्षाने राज्यातील संघटन अधिक बळकट करण्यासाठी विविध शहरांतील अध्यक्षपदाच्या निवडी जाहीर केल्या असून, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यभरातील संघटनात्मक फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर, भाजपने पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, नागपूर आदी प्रमुख शहरांसह पिंपरी-चिंचवडमध्येही नवीन नेतृत्वाची घोषणा केली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाचे खंबीर संघटन उभे करण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्ट झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये काटे यांची निवड ही संघटनेतील अनुभव आणि स्थानिक पातळीवरील सक्रियतेचा गौरव मानली जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत, पक्षाचं वर्चस्व टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आता त्यांच्या खांद्यावर आहे.

शत्रुघ्न काटे यांना भाजपमधील जुने आणि नवे कार्यकर्ते यांच्यात सेतू म्हणून पाहिले जाते. पक्ष संघटना मजबूत करणे, जनतेशी थेट संवाद साधणे आणि आगामी राजकीय रणनिती आखणे या बाबतीत त्यांच्याकडून पक्षश्रेष्ठींनी अपेक्षा ठेवलेल्या आहेत.

SSC बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर ; यंदाही राज्यात मुलींची बाजी, येथे पाहाल निकाल.. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. यंदा दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.

या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातील एकूण 16 लाख 10  हजार 908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 15 लाख 98 हजार 553 विद्यार्थी बसले. 14 लाख 87 हजार 399 विद्यार्थी पास झाले. टक्केवारी 93.4 टक्के आहे. फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल ९४.१० टक्के आहे, तर सर्व विद्यार्थ्यांचा (खासगी, दिव्यांग, फ्रेश, पुनरपरीक्षार्थी) निकाल 93.4 टक्के आहे.

निकाल कुठे पाहायचा?

दहावीचा निकाल एसएससी बोर्डाचे विद्यार्थी खालील वेबसाईटवर पाहू शकतात, या वेबसाईटवरुन निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट कशी काढावी याची माहितीही खाली पाहू शकता.

mahahsscboard.maharashtra.gov.in

mahresult.nic.in

results.gov.in

results.nic.in

mahahsscboard.in

निकाल कसा डाऊनलोड करायचा?

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल 2025 तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करा.

mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होम पेजवर, ‘महाराष्ट्र दहावी किंवा दहावीचा निकाल 2025’ लिंक तपासा. विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.

विद्यार्थी भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘पीसीएमसी @ 50’ मोहिमेंतर्गत सुरू केले नागरिक सर्वेक्षण

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘पीसीएमसी @ 50’ व्हिजन मोहिमेंतर्गत नागरिक सर्वेक्षणाची सुरुवात पिंपरी चिंचवड शहराच्या विविध विभागांमध्ये झाली आहे.  स्वयंसहाय्यता गटांच्या २५० हून अधिक प्रशिक्षित महिलांमार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. २०३२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत.  महापालिकेच्या या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकास धोरणासाठी जवळपास २० हजार  नागरिकांचा फीडबॅक गोळा करणे, हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने सक्षमा उपक्रमा अंतर्गत ही मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिकेचा सिटी ट्रान्सफॉर्मेशन उपक्रम (सीटीओ) सहकार्य करीत आहे. या सर्वेक्षणात निवासी व्यक्ती, व्यावसायिक आस्थापने आणि विविध संस्था येथील नागरिकांचा फीडबॅक गोळा केला जाणार आहे.

नागरिक या सर्वेक्षणात ऑनलाइन देखील सहभागी होऊ शकतात. महापालिकेच्या विविध विभाग कार्यालयांमध्ये आणि तसेच शहरातील विविध ठिकाणी याबाबत क्युआर कोड लावण्यात आले आहेत. हा कोड स्कॅन करून नागरिकांना सर्वेक्षणात ऑनलाइन सहभागी होता येईल. याशिवाय महापालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन  सर्वेक्षणात सहभागी होता येईल.

“ पिंपरी चिंचवड शहराच्या भवितव्याला आकार देण्यासाठी ‘पीसीएमसी @ 50’ व्हिजन हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांना सहकार्य करावे. तसेच सर्वेक्षण फॉर्म भरताना तुमचे योग्य मत नोंदवा. तुमचे मत आपल्या शहराच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे आहे.”

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

भारताचा पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे एअर स्ट्राईक, पाकमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त…

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला काय उत्तर देणार याकडे जगाचं लक्ष लागलं होतं. ज्यानंतर एका गुप्त मोहिमेच्या अंतर्गत एअर स्ट्राईक केला आहे. भारतीय सैन्य दलानं जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये नऊ ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला.

या ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक..

१) बहावलपूर

२) मुरिदके

३) गुलपूर

४) भीमबर

५) चक अमरु

६) बाग

७) कोटली

८) सियालकोट

९) मुजफ्फराबाद

पिंपरी- चिंचवड शहरात पाणीटंचाई गंभीर; नागरिकांना तातडीने पुरेसे पाणी द्या; आमदार शंकर जगताप यांचे प्रशासनाला निर्देश


पिंपरी-चिंचवड शहरात सोसायट्यांना कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशा पाण्याचा तुटवडा भासत असल्याने आमदार शंकर जगताप यांनी बैठक घेत प्रशासनाला चांगलेच सुनावले. पाण्याची गळती आणि अपव्यय रोखून नागरिकांना त्वरित समाधानकारक पाणीपुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सोसायट्यांना सध्या निर्धारित कोट्यापेक्षा कमी पाणी मिळत असून, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. कडक उन्हाळ्यात पाण्याच्या या संकटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी चिंचवडगावात पाण्याच्या टाकी खाली महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

या बैठकीत जगताप यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. पाण्याची गळती, गैरवापर व अपव्ययाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. व्यावसायिक वापराच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याला पूर्ण प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

“पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आणि सोसायटीला नियमानुसार व पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने तातडीने कामाला लागावे,” असे स्पष्ट निर्देश आमदार जगताप यांनी दिले.

बैठकीस भाजपा जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माधुरी कुलकर्णी, माजी स्वीकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, भाजपा उपाध्यक्ष शेखर चिंचवडे तसेच इतर स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनातर्फे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दीपक पाटील, उपअभियंते चंद्रकांत मोरे व देसाई, कनिष्ठ अभियंता साकेत पावरा तसेच रघुनाथ शेमले, राहुल पाटील, सागर पाटील, संदीप ढेपले, शरद मोरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत नागरिकांचे प्रश्न गांभीर्याने घेत तातडीने त्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केला आहे.  मंडळाने निकालाची माहिती सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेतून जाहीर केली. प्रत्यक्षात निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यंदाही बारावीमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. दरम्यान आजच्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.74 टक्के इतका लागला आहे. तर यामध्ये सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46  टक्के इतका लागला आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण तिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे म्हणजे मुलींची उत्तीर्णणशतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्के ने जास्त आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून mahahsscboard.in, hscresult.mkcl.org,  maharashtra-hsc-12-results आणि results.digilocker.gov.in या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन निकाल पाहता येतील. तर, महाविद्यालयांना आवश्यक कॉलेज लॉग-इनसह mahahsscboard.in वर एकत्रित निकाल पाहता येतील.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे

पुणे – ९१.३२

नागपूर – ९०. ५२

छत्रपती संभाजीनगर – ९२.२४

मुंबई -९२.९३

कोल्हापूर – ९३.६४

अमरावती – ९१.४३

नाशिक – ९१.३१

लातूर – ८९.४६

कोकण – ९६.७४

निकालाचा टक्का घसरला

फेब्रुवारी-मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के होता. फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल १.४९ टक्केने कमी आहे.

प्रातिज्ञ’ उपक्रमांतर्गत भारत सरकार व डी. वाय. पाटील लिबरल आर्ट्सचा नृत्य-संगीत कार्यक्रम संपन्न

पिंपरी : संगीत नाटक अकादमी, भारत सरकार व डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रातिज्ञ’ उपक्रमांतर्गत भरतनाट्यम आणि सुरबहार वादनाचा एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम २५ एप्रिल २०२५ रोजी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज ऑडिटोरियम येथे पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती होती प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, पद्मश्री व एस.एन.ए. फेलो कल्याण सुंदरम पिल्लई (वय ९३), एस.एन.ए. पुरस्कारप्राप्त सुरबहार वादक पुष्पराज कोष्टी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. ए. रेखा, आणि IQAC संचालक डॉ. वत्सला स्वामी यांची.प्रारंभी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सचे संचालक व ज्येष्ठ कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांनी प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. पाटील यांच्या हस्ते पद्मश्री कल्याण सुंदरम पिल्लई यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात कल्याण सुंदरम यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. त्यानंतर त्यांच्या भरतनाट्यम नृत्यावरील सप्रयोग व्याख्यानाने रसिकांना भारावून टाकले. वयाच्या ९३व्या वर्षीही त्यांनी नृत्यमुद्रा सादर करून उपस्थितांना अचंबित केले. त्यांच्या पुत्र हरिकृष्ण पिल्लई यांनीही भरतनाट्यम सादर केले.डॉ. भाग्यश्री पाटील यांनी गायलेले गुरुवंदना व राजराजेश्वरी अष्टकम, यावर स्वाती दैठणकर यांनी सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर पुष्पराज कोष्टी यांच्या सुरबहार वादनाने वातावरण भारून गेले.

कार्यक्रमास स्वाती दैठणकर, निकिता मोघे, विणा अरकेरी आदी मान्यवर कलावंत उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा चव्हाण यांनी केले.