Saturday, December 9, 2023
Home Blog

दसरा-दिवाळी स्पेशल – आजपासून ४० दिवसांसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष ट्रेन्स

२० ऑक्टोबर २०२०,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आजपसान ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांअगोदरच सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. शिवाय, या ट्रेनना फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे नाव देखील देण्यात आले आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या ट्रेन्स धावणार आहेत.

रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ट्रेन कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे.

सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या, मात्र एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते की, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील. तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते. त्यानुसार आता ३९२ विेशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. रेल्वेकडून या विशेष ट्रेन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंगचे न पालन करणे महागात पडू शकते. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास रेल्वेकडून दंड आकारला जाऊ शकतो.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

सद्यस्थितीस एकूण ६६६ मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू आहेत. तर, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमीत ट्रेन्स

दसरा-दिवाळी स्पेशल : आजपासून ४० दिवसांसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष ट्रेन्स
२० ऑक्टोबर २०२०,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आजपसान ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांअगोदरच सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. शिवाय, या ट्रेनना फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे नाव देखील देण्यात आले आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या ट्रेन्स धावणार आहेत.

रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ट्रेन कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे.

सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या, मात्र एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते की, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील. तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते. त्यानुसार आता ३९२ विेशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. रेल्वेकडून या विशेष ट्रेन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंगचे न पालन करणे महागात पडू शकते. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास रेल्वेकडून दंड आकारला जाऊ शकतो.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

सद्यस्थितीस एकूण ६६६ मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू आहेत. तर, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमीत ट्रेन्स अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.

शंभराव्या नाट्य संमेलनाचा मान पिंपरी चिंचवड शहराला – भाऊसाहेब भोईर

सहा – सात जानेवारीला सारस्वतांची मांदियाळी; शरद पवार स्वागताध्यक्ष, डॉ. जब्बार पटेल संमेलनाध्यक्ष,

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे ऐतिहासिक नाट्य संमेलन (६ आणि ७ जानेवारी २०२४) असे दोन दिवस पिंपरी चिंचवड शहरांमध्ये होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष तर स्वागत समिती अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत असतील अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजेशकुमार साकला, राजेंद्र बंग, संतोष रासने, संतोष शिंदे, प्रणव जोशी, गौरी लोंढे, हर्षवर्धन भोईर, आकाश थिटे आणि नाट्य परिषदेचे सदस्य उपस्थित होते.भाऊसाहेब भोईर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये शंभरावे नाट्य संमेलन होत आहे. ही अभिमानाची आणि शहराच्या दृष्टीने गौरवशाली बाब आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते ७९ व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याचवेळी शंभरावे नाट्य संमेलन पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात व्हावे ही अपेक्षा होती आणि त्याला स्वागत अध्यक्ष म्हणून पवार साहेब यांना बोलवावे अशी मनोमन इच्छा होती आणि योगायोगाने ही इच्छा पूर्ण होत आहे. २७ वर्षांच्या कालखंडात उदयोन्मुख कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्य संकुल उभे करता आले नाही, ही खंत आहे. मात्र नियोजित नाट्य संमेलनाच्या निमित्ताने ही उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. देणगी स्वरूपामध्ये आर्थिक मदत घेऊन शहरात सुसज्ज असे नाट्य संकुल उभे करण्याचा संकल्प पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आहे असेही भोईर यांनी सांगितले.

२७ वर्षांपूर्वी शहराची उद्योग नगरी अशी ओळख होती. स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी जाणीवपूर्वक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून पिंपरी चिंचवडला सांस्कृतिक शहर अशी ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. म्हणूनच गेल्या २७ वर्षांत मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वेळोवेळी आपले कलागुण सादर केले. याचा मनस्वी आनंद आहे. तसेच मराठी नाट्य चित्रपट सृष्टीत स्थानिक कलावंतांनी आपली ओळख निर्माण केली, याचा मनस्वी आनंद आहे, असे कृष्णकुमार गोयल म्हणाले.

नाट्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी नाट्य स्पर्धेत गाजलेल्या विविध नाटकांचे प्रयोग प्रायोगिक नाटके, नाट्यछटा एकपात्री प्रयोग एकांकिका कीर्तन, लोककला, महाराष्ट्रात गाजलेल्या विविध लावणी सम्राज्ञींचा लावणी महोत्सव, संगीत व नृत्य विषयक कार्यक्रम बालनाट्य व संबंध महाराष्ट्रातील स्पर्धांमध्ये नावाजलेल्या उल्लेखनीय एकांकिका व नाटकांचे प्रयोग होणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरांमधील आबाल वृद्ध रसिकांसाठी ही एक सांस्कृतिक पर्वणी आहे असे भोईर यांनी सांगितले.

स्थायी समिती बैठकीमध्ये शहराच्या विविध विकास कामास मंजुरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

सन २०२३- २४ करिता काळेवाडी, पवनानगर, विजयनगर, किवळे मामुर्डी, रावेत येथील सेक्टर नं. २९, सिटी प्राईड शाळेलगतचा परिसर, म्हस्के वस्ती, शिंदे वस्ती, काळेवाडी, नढेनगर, कोकणेनगर व इतर परिसरात मुख्य जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. मनपाचे प्रभाग क्र. २ मधील अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामांवर कार्यवाहीसाठी लागणारी यंत्रसामृगी व मनुष्यबळ पुरविणेकामी तसेच मनपाचे नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी येथील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची वार्षिक पद्धतीने देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

चिखली सेक्टर क्रमांक १७ व १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ई.डब्ल्यु.एस) गृहप्रकल्पामध्ये बहुउद्देशीय इमारत बांधणेकामी येणाऱ्या खर्चास प्रभाग क्र. २५ पुनावळे येथील गायकवाड नगर मधील १८.०० मीटर रुंद डी.पी रस्त्यांची उर्वरित स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. ८ मध्ये जलतरण तलाव विकसित करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. २४ किवळे येथील उद्यानाकरिता आरक्षित असलेल्या मनपाच्या ताब्यातील जागेत भारतरत्न राष्ट्रीय उद्यान विकसित करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक २ मधील बोऱ्हाडेवाडी व बनकरवस्ती परिसरात पावसाचे पाण्यासाठी आरसीसी पाईप लाईन टाकणे व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये फुटपाथ, स्ट्रॉर्म वॉटर व इतर स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये गल्ल्यांचे कॉन्क्रीटीकरण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच जल्लोष शिक्षणाचा २०२३ मधील विजेत्या शाळांना क्रीडा साहित्याची खरेदी करून पुरवठा करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या क्ष किरण विभागातील डिजीटल रेडिओग्राफी सिस्टमसाठी जनरेटर खरेदी करणेकामी तसेच मनपाचे प्रभाग क्रमांक ३ मोशी डुडुळगाव व इतर परिसरातील स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक १९ मधील मनपा इमारतीमध्ये फर्निचर व इतर देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी तसेच मनपाचे प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी, दत्तवाडी व परिसरातील स्ट्रॉम वॉटर, फुटपाथ विषयक कामे करणेकामी मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची व इतर अनुषंगिक कामे करणेकामी तसेच बिजलीनगर, दळवीनगर, चिंचवड, तानाजीनगर, केशवनगर व इतर परिसरात जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे अ क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभाल करणेकामी तसेच मनपाच्या भाटनगर येथील लिंक रस्त्यावरील विद्युत दाहिनीचे तीन वर्षाकरिता चालन देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक १९ मध्ये रोड फर्निचर व इतर अनुषंगिक कामे करणेकामी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसीनुसार स्थापत्य विषयक सुधारणांची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक १७ मधील वाल्हेकरवाडी, भोंडवेवस्ती इ. भागातील रस्त्यांची दुरूस्तीची कामे हॉटमिक्स पद्धतीने करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच मनपाच्या मालकीची चिंचवड येथील २००० चौ.मी मोकळी जागा तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबीर / ट्रांझीट कॅम्पकरिता भाडेतत्वावर उपलब्ध करून देणेबाबत मान्यता देण्यात आली.

मौजे, चिखली प्राधिकरण येथील प्रभाग क्र. ११ मधील उपहारगृह (४ गाळ्यांचे) ताबे देणेबाबत तसेच प्रभाग क्रमांक १७ मधील शिवनगरी, बिजलीनगर इत्यादी भागात आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी तसेच विविध भागात आवश्यकतेनुसार पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, चेंबर्स, पेव्हिंग ब्लॉक इ. दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे वायसीएमएच रुग्णालयासाठी आवश्यक लिनन साहित्य खरेदी करणेकामी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) व स्थापत्य आभियांत्रिकी सहाय्यक कर्मचारी यांचेसाठी सेवाप्रवेश पातळीवर प्रशिक्षण कार्यक्रम करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मोठी बातमी: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंची एसआयटीमार्फत चौकशी होणार?

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन मृत्यूप्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाबाबत घोषणा केली जाऊ शकते. याप्रकरणात भाजपचे नेते पूर्वीपासूनच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांवर आरोप करत आले आहेत. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता एसआयटीकडून याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी केली जाऊ शकते, असा सूत्रांचा अंदाज आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली ही एसआयटी टीम दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच तपास करेल. एसआयटीने आदित्य ठाकरे यांना चौकशीला पाचारण केल्यास ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागेल. मात्र, एसआयटीने आदित्य ठाकरे यांची चौकशी केल्यास हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी होते कुठे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. भाजप नेत्यांमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याकडून दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांच्यावर सतत आरोप केले जातात. मध्यंतरी दिशा सालियन हिच्या पालकांनी राणे पिता-पुत्रांविरोधात बदनामीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नारायण राणे यांना चौकशीसाठी मालवणी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.

नारायण राणे यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणी अनेक पत्रकारपरिषदा घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दिशा सालियनची हत्या ८ जूनला आणि सुशांतची हत्या १३ जूनला हत्या झाली. आमच्या वक्तव्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. मंत्र्याची गाडी होती असे बोलू नका. तुम्हाला पण मुले आहेत. तुम्ही असे काय करू नका. हे मी माझ्या जबाबात सांगितले मात्र हे वाक्य वगळले जबाबातून वगळण्यात आले आहे. दिशा सालियनचे प्रकरणाची फाईल बंद करण्यात येत असून हे सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत आहे, असा आरोपही राणे यांनी केला होता.

सकाळची शाळा नकोच, राज्यपालांच्या सूचनेला पालकांचाही पाठिंबा

मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्यानंतर, त्याला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा मिळत आहे. सध्या सकाळच्या सत्रातील शाळा सात वाजताच्या आसपास भरत असून, ही वेळ नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल. पालकांची सकाळी पाच वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी राज्यपाल बैस यांनी सकाळच्या सत्राच्या शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या. बदलत्या जीवनशैलीनुसार प्रामुख्याने शहरी भागांतील पालकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या असून, अनेक पालक रात्रपाळी आणि कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागे असतात. त्यामुळे मुलेही रात्री उशिरापर्यंत जागी असतात. त्यातही मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढला आहे. अनेक मुले रात्री मोबाइल किंवा कम्प्युटर पाहतात.

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या (पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक) शाळा सकाळी सातच्या आसपास भरतात. त्यासाठी मुलांना पहाटे सहा वाजल्यापासून, तर पालकांना जेवणाचा डबा आणि मुलांची तयारी करण्यासाठी पहाटे पाच वाजताच उठावे लागते. या सर्वांत मुलांची झोप पूर्ण होत नाहीच; शिवाय पालकांनाही धावपळ करावी लागते. या पार्श्वभूमीवर शाळांच्या सकाळच्या वेळा बदलण्याबाबत अधूनमधून चर्चा होते. मात्र, राज्यपाल बैस यांनी सरकारला सूचना दिल्यामुळे, आता पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकार सकाळी भरणाऱ्या शाळांच्या वेळा बदलणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

शाळेत मुले झोपेतच असतात

‘झोपेच्या गणितानुसार शाळेच्या वेळा बदलण्याबाबत सकारात्मक विचार व्हायला हवा. टीव्ही आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. आई-वडील नोकरी करणारे असल्याने, त्यांच्या कामावरून घरी परतण्याच्या वेळाही रात्री उशिराच्या असतात. अशा वेळी स्वाभाविकपणेच सर्व कुटुंबाला झोपायला उशीर होतो. फक्त शहरातच नाही, तर खेड्यापाड्यातसुद्धा रात्री ११ किंवा त्यानंतर झोपणे अगदी स्वाभाविक मानले जाते. शाळेत जाण्यासाठी म्हणून मुलांना सकाळी लवकर उठवले जाते. अशा वेळी मुले सकाळचे शाळेतीस दोन-तीन घड्याळी तास झोपेतच जातात. त्यामुळे शिक्षकांच्या शिकवण्याकडे त्यांचे लक्ष नसते,’ असे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मेघना जोशी यांनी मांडले.

काही शाळा अगदी सात वाजता भरवल्या जातात. त्यापेक्षा सकाळी आठ किंवा नऊ ही वेळ अधिक योग्य वाटते. पालक उशिरा जेवणारे, टीव्ही बघत लोळणारे असतील, तर मुलेही तेच करतात. पूर्ण कुटुंबाने मुलांच्या दिनक्रमाप्रमाणे बदल करून मुलांची झोप किमान सात तास झाली पाहिजे, याकडे लक्ष द्यायला हवे.

  • अनुजा जगताप, पालक
    मुलांची झोप त्यांच्या शिकण्यात, लक्षात राहण्याबाबत आणि मेंदूच्या विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पालक म्हणून आपण मुलांना चांगले शिक्षण मिळण्याबाबत आग्रही असले पाहिजे. त्याच वेळी त्यांचे आरोग्यही उत्तम राहण्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी मुलांची झोप हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे राज्यपालांच्या म्हणण्याप्रमाणे शाळा उशिराने सुरू होणार असल्यास, पालक स्वागत करतील.
  • प्रीतीश उमाठे, पालक
    राज्यातील अनेक शाळा दोन सत्रांत सुरू आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रातील वेळ बदलण्याबाबत निर्णय तातडीने घेणे सोयीचे ठरणार नाही. मुलांच्या झोपेचा आणि शिकण्याचा संबंधांचा शास्त्रशुद्ध अभ्यास अजून झालेला नाही. सरकार प्रायोगिक तत्त्वावर काही शाळांत हा प्रयोग करू शकते. त्यानंतर राज्यभर शाळांच्या सकाळच्या वेळा बदलण्याबाबत विचार करता येईल.
  • महेंद्र गणपुले, प्रवक्ते, मुख्याध्यापक महामंडळ

दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांना सकाळच्या शाळांची वेळ बदलणे शक्य होणार नाही. मात्र, सकाळी सातऐवजी आठ वाजता शाळा सुरू करता येतील. पालकांनीसुद्धा शाळा निवडताना, घराच्या जवळील निवडावी. त्यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि मुलांनाही लवकर शाळेत जाता येईल.

  • जागृती धर्माधिकारी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ

जीवनशैली बदला किंवा साडेआठला शाळा भरवा’
‘मुलांची आठ तास झोप झाल्यास, त्यांचा मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो. बदलत्या जीवनशैलीमुळे रात्री उशिरापर्यंत पालक जागे असल्याने, मुलेही जागतात. अशा वेळी लवकर झोपून, आठ तासांची झोप घेतल्यानंतर सकाळीच शाळेत गेल्यास हरकत नाही. मात्र, पूर्ण झोप न घेता सकाळी सातला शाळेत जाणे हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. पोट साफ न होणे, मेंदूला आराम न मिळणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सकाळी सातऐवजी साडेआठच्या आसपास शाळा सुरू होऊ शकल्यास, मुले वाहतूक कोंडीपूर्वी शाळेत जातील,’ असे मेंदू अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितले.

आधी प्रकल्प गेले, आता पुण्याच्या करंदी गावातील कारखाना पण गुजरातला जाणार ?

पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातून आणखी एक कारखाना आता महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा तयारीत आहे. गुजरातच्या राजकोट याठिकाणी पुण्याजवळील करंदी गावातून हा कारखाना जाण्याच्या तयारीत आहे. शिरुर तालुक्यातील करंदी या गावात २००८ पासून सुरू असलेला संकल्प इंजिनिअरिंग हा कारखाना स्थलांतरित होणार आहे. याचं कारण मात्र प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून जाण्याचा निर्णय घेत असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात येत आहे.

दीड ते दोन हजारांहून अधिक कामगारांवर अवलंबून असलेला हा कारखाना २००८ साली खाजगी जागेवर सुरू झाला. शेजारीच महसूल विभागाची जागा असल्याने महसूल विभागाच्या परवानगीने १०० मीटर अंतराचा रस्ता कारखान्याने वापरात घेतला. पुढे ही महसूल विभागाची जागा वन विभागाकडे हस्तांतरित झाली. आता मात्र वन विभागावर दबाव आणून काही महाशयांनी हा कारखाना बंद करण्यासाठी प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळून कारखान्याच्या मालकाने महाराष्ट्रात प्रकल्प नकोच असं म्हणत गुजरातला पसंती देण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे सरकार महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आणण्यासाठी उद्योजकांना सवलती देण्याचा विचार करत आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील आहेत तेच प्रकल्प बाहेर कसे जातील, याची वाट पाहत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील मजकूर; चारजण ताब्यात

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर होत असलेल्या टीका-टिप्पणीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर राजकीय नेत्यांवर टीका करताना खासगी, वैयक्तिक, चारित्र्यावर शंका उपस्थित करणारे मजकूर प्रसारीत केले जातात.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत एक अश्लील पोस्ट विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे, अमोल के. पाटील यांनी फेसबुकवर शेअर केली होती. या चौघांवर पुणे सायबर पोलीस ठाण्यात आयपीसी 354 (अ) आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यातील संशयित असलेल्या जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे आणि अमोल पाटील यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांचे मोबाईल क्रमांक सायबर पोलिसांनी मिळवले. त्याआधारे पोलीस पोलिसांनी जयंत रामचंद्र पाटील या सांगली जिल्ह्यातील धनगरवाडीत राहणाऱ्या आरोपीपर्यंत पोहचले . त्याला ताब्यात घेतले असता तपसादरम्यान तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस देऊन त्याचा जबाब नोंदवून मोबाईल जप्त केला.

तसेच सोशल मीडिया पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट केलेल्या फेसबुक युजर नावाचे अकाऊंट असलेल्या संशयित व्यक्तीची फेसबुक कंपनीकडून तांत्रिक माहिती घेण्यात आली. पोलिसांनी वसंत रमेशराव खुळे (वय-34 रा. रहाटी, ता.जि. परभणी) याचा शोध घेतला असता आरोप रहाटी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने रहाटी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला सायबर पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवून घेत फोन जप्त केला. त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

याशिवाय फेसबुक युजर प्रदीप कणसे नावाने पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट करण्यात आली होती. पोलिसांनी हे फेसबुक अकाउंट वापरणाऱ्या संशयिताचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याला देखील सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस दिली आहे. सायबर पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर अश्लील पोस्ट करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्यांचा माग काढून गुन्हा उघडकीस आणला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा’ ही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

पुणे मनपाने ऐतिहासिक भिडे वाड्याचा घेतला ताबा, पोलिस बंदोबस्तात रातोरात फत्ते केली मोहीम…

मुलींची देशातील पहिली शाळा पुण्यातल्या ज्या भिडे वाड्यात सुरू झाली होती तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महानगरपालिकेने जमीनदोस्त केला आहे. गेल्याच महिन्यात सर्व भाडेकरूंची याचिका सुप्रीम कोर्ट फेटाळून लावली आणि भिडे वाडा पालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला. त्यानुसार मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुणे मनपाने ऐतिहासिक भिडे वाड्याचा ताबा घेतला. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही मोहिम रातोरात फत्ते केली गेली. आता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाईल.

क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा शहरातील बुधवार पेठ येथील तात्याराव भिडे वाड्यामध्ये सुरू केली होती. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम 2006 पासून रखडले आहे. भिडे वाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बँकेच्या चोवीस भाडेकरूंनी या प्रकरणी पालिकेविरोधात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयात 80 वेळा सुनावणी होऊन पुणे महापालिकेच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला.

भिडेवाडा पालिकेकडे हस्तांतरित करा, कोर्टाचा आदेश
या निकाला विरोधात भाडेकरूनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या वाड्याबाबत पालिकेने सर्वोच्च न्यायालयात अगोदरच कॅव्हेट दाखल केली आहे. या संदर्भात गुरुवारी सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने भिडे वाडा संदर्भातील याचिका फेटाळली. 13 वर्षे या स्मारकासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करून याचिका करतांना तुम्हाला दंड का करू नये, असा प्रश्न केला. एका महिन्यात भिडेवाडा रिकामा करून महापालिकेकडे हस्तांतरित करा, असा आदेश दिला. तसेच असे न केल्यास महापालिका जबरदस्तीने भूसंपादन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

देशातील पहिली मुलींची शाळा..
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या भिडेवाड्याचे आता राष्ट्रीय स्मारक होण्याचा शेवटचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा भिडे वाड्यात विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा सुरु होणार आहे. या वाड्यात पुन्हा शाळा सुरु व्हावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे.

वाघोलीत ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने स्कूल बस झाडावर आदळली, अनेक विद्यार्थी जखमी

पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं व्हिडीओतून स्पष्ट होतंय. या बसच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बसवरती आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

जखमी मुलांवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या बसचा ज्यावेळी अपघात झाला त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ही बस रस्ता सोडून थेट बाजूला असल्याच्या झाडावर आदळली असल्याचं त्यातून दिसतंय. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीत रायझिंग स्टार नावाची शाळा आहे. या शाळेसाठी विद्यार्थी हे बसमधून निघाले होते. त्या बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात झाला त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली आणि मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

ड्रायव्हरची चूक, मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
सीसीटीव्ही फुटेजवरून या अपघातासाठी बसचा ड्रायव्हर जबाबदार असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे आरटीओने या बस ड्रायव्हरवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने ग्रामस्थ आक्रमक, संजीवन समाधी सोहळ्यावर बंदचं सावट

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट आहे. देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलण्यात आल्यानं ग्रामस्थांनी आज आळंदी बंदची हाक दिली आहे. या बंदमुळे लाखो वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आळंदी देवस्थानच्या तीन विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली. यात योगी निरंजननाथ, ऍड. राजेंद्र उमाप आणि डॉ भावार्थ देखणेंचा समावेश आहे. मात्र स्थानिकांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं. म्हणूनच आळंदीकर आक्रमक झालेत. सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.

संजीवन समाधी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी बंद पुकारून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. संत नामदेव, संत पांडुरंग आणि संत कुंडलिक यांची पालखी लाखो वारकऱ्यांसह अलंकापुरीत दाखल होतात. अशावेळी आळंदी बंद ठेवली जाणार असल्यानं, वारकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानने आळंदीनगरी बंद ठेऊ नये, असं आवाहन ही केलेलं आहे. मात्र आंदोलक आपल्या भूमीकेवर ठाम असून वारकऱ्यांना कोणताही ही त्रास होणार नाही, याची खबरदारी आंदोलक घेणार आहेत.

संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठुरायाची पालखी आळंदीत दाखल..

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठुरायाची पालखी पंढरपुरातून आळंदीत दाखल झाली आहे. 700 वर्षापूर्वी भक्ताला दिलेला शब्द आजही पाळला जात आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने 2014 पासून विठ्ठलाच्या पादुका आळंदीकडे पायी वारी करत नेल्या जातात. दरवर्षी विठ्ठलाच्या पादुका तसेच संत नामदेवराय आणि संत पुंडलिकांच्या पादुका कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर पौर्णिमेला पंढरपुरातून पायी प्रस्थान करतात.रोज 35 ते 40 किलोमिटर अंतर कापत सोहळा अष्टमी दिवशी आळंदी येथे पोचणार आहे. 700 वर्षांपूर्वी विठ्ठलाने आपला लाडका भक्त ज्ञानेश्वर माऊलींना यापुढे दरवर्षी संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीस येईल असा शब्द दिला होता . आज देवाच्या पादुकांसह हजारो भाविकांनी आळंदीकडे प्रस्थान ठेवले

आळंदीत हरिनामाचा अखंड गजर
कार्तिक महिन्याती आळंदी यात्रेचे महत्त्व पंढरपूर येथील कार्तिकी यात्रा तीन दिवसांची असते, तर आळंदी येथील यात्रेचा कालावधी आठ दिवसांचा असतो. त्यामुळे येथे भाविकांचा प्रचंड ओघ असतो. भाविकांच्या भक्ती भावामध्ये ही यात्रा साजरी होते.त्यामुळे सर्व वारकरी माऊलींच्या भक्तीत तल्लीन होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झालेत. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून भाविकांनी माऊलीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांनी आळंदीत ग्रंथ, गळ्यातील तुळशीची माळ खरेदी करण्यावर भर दिला. राहुट्यांमध्ये भाविकांनी हरिनामाचा अखंड गजर सुरु आहे.