Saturday, April 11, 2026
Home Blog

दसरा-दिवाळी स्पेशल – आजपासून ४० दिवसांसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष ट्रेन्स

२० ऑक्टोबर २०२०,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आजपसान ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांअगोदरच सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. शिवाय, या ट्रेनना फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे नाव देखील देण्यात आले आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या ट्रेन्स धावणार आहेत.

रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ट्रेन कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे.

सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या, मात्र एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते की, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील. तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते. त्यानुसार आता ३९२ विेशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. रेल्वेकडून या विशेष ट्रेन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंगचे न पालन करणे महागात पडू शकते. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास रेल्वेकडून दंड आकारला जाऊ शकतो.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

सद्यस्थितीस एकूण ६६६ मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू आहेत. तर, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमीत ट्रेन्स

दसरा-दिवाळी स्पेशल : आजपासून ४० दिवसांसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष ट्रेन्स
२० ऑक्टोबर २०२०,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आजपसान ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांअगोदरच सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. शिवाय, या ट्रेनना फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे नाव देखील देण्यात आले आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या ट्रेन्स धावणार आहेत.

रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ट्रेन कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे.

सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या, मात्र एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते की, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील. तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते. त्यानुसार आता ३९२ विेशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. रेल्वेकडून या विशेष ट्रेन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंगचे न पालन करणे महागात पडू शकते. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास रेल्वेकडून दंड आकारला जाऊ शकतो.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

सद्यस्थितीस एकूण ६६६ मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू आहेत. तर, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमीत ट्रेन्स अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.

गुणवत्तेला प्राधान्य देत नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रकल्प वेळेत पूर्ण करा – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ही केवळ एक इमारत नसून नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि आधुनिक सेवा देणारे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता अबाधित राखत हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावा. कोणतीही तडजोड न करता दर्जेदार काम व्हावे, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची महापौर रवि लांडगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेत विविध कामांच्या गुणवत्तेबाबत तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

याप्रसंगी नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य कुशाग्र कदम, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, अनिल भालसाखळे, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, बाळू लांडे यांच्यासह विनायक साठे, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी कामाची गुणवत्ता अबाधित ठेवत प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना अत्याधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ही शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून उभारली जात असून ती नागरिकांसाठी एक सक्षम, सुटसुटीत आणि तंत्रज्ञानाधारित सेवा केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली अधिक जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध होतील. त्यामुळे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता राखणे आणि निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करत कोणतीही तडजोड न करता दर्जेदार काम पूर्ण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीच्या कामकाजाबाबत माहिती देताना सांगितले की, नवीन इमारतीचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गुणवत्ता, सुरक्षा आणि वेळेचे नियोजन या तिन्ही बाबींवर प्रशासनाचा विशेष भर आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहे.

मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी यावेळी नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली.

पिंपरी महापालिकेत ५२ कोटींचा ‘अंदाजपत्रकीय’ घोटाळा ? भाजपच्या नगरसेवकांसह आमदारांवर विरोधकांचे गंभीर आरोप

थेट सहभाग असल्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा दावा; निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकात तब्बल ५२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. या प्रकरणाला आता तीव्र राजकीय रंग चढला असून, यामध्ये भाजपचे नगरसेवक आणि एका बड्या आमदाराचा थेट हात असल्याचा दावा करत विरोधकांनी पालिका प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.

या संदर्भात शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक संदीप वाघेरे आणि निलेश बारणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका ऐश्वर्या तरस आणि रेश्मा कातळे उपस्थित होत्या.

उपसूचनांचा बनाव आणि बनावट सह्यांचा संशय

पत्रकार परिषदेत बोलताना सुलभा उबाळे म्हणाल्या की, “३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यासाठी अनेक उपसूचना मांडण्यात आल्या. या उपसूचनांच्या आधारे घाईघाईने मोठी बिले काढण्यात आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व उपसूचनांवर भाजपच्याच नगरसेवकांच्या सह्या आहेत. काही नगरसेवकांच्या प्रभागातील विषय नसतानाही त्यांनी यावर सह्या का केल्या? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता की काही ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाले, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे.”

काही नगरसेवकांनी या उपसूचनांवर आपल्या सह्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेत बनावट सह्यांचे रॅकेट कार्यरत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी उबाळे यांनी केली.

आमदारांच्या निकटवर्तीय ठेकेदारासाठी खटाटोप?

राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी थेट भाजप आमदारांवर तोफ डागली. “एका भाजप आमदाराच्या जवळच्या ठेकेदाराचे हित जपण्यासाठीच हा ५२ कोटींचा गैरप्रकार घडवून आणला आहे. महापालिका प्रशासनाची याला मूक संमती आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने याची चौकशी कोणत्याही समितीमार्फत न करता निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी ठाम भूमिका वाघेरे यांनी मांडली.

पालिका वर्तुळात खळबळ

अंदाजपत्रकातील या कथित घोटाळ्यामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय अधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आगामी काळात पिंपरी-चिंचवडचे राजकारण या मुद्द्यावरून अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्दे:

• गैरव्यवहार: ५२ कोटी रुपये.

• आरोप: भाजप नगरसेवक आणि आमदारांचा थेट सहभाग.

• मागणी: निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी आणि फौजदारी कारवाई.

• संशय: सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली बनावट सह्या केल्याचा आरोप.

बोगस उपसूचना की कोट्यवधींचा झोल? पिंपरी पालिकेतील ‘त्या’ ५० कोटींच्या व्यवहाराचे पेमेंट आयुक्तांनी रोखले!

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित ५० कोटींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारावरून सुरू झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून, सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमी आणि आरोप

स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी लेखा विभागावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार:

• बजेटमध्ये कोणतीही अधिकृत तरतूद नसताना कोट्यवधी रुपयांची देयके (Payments) काढण्यात आली.

• काही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचा गैरवापर करून बोगस उपसूचना तयार करण्यात आल्या.

• या बोगस उपसूचनांच्या आधारे निधीचे वितरण करण्यात आले.

या गैरव्यवहारामुळे बारणे यांनी प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे.

प्रशासनाची भूमिका आणि कारवाई

वाढता वाद आणि आरोपांची तीव्रता लक्षात घेता आयुक्तांनी तातडीने पावले उचलली आहेत. आयुक्तांनी स्पष्ट केले की:

1. चौकशी समिती: अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या नेतृत्वाखालील समिती सात दिवसांत आपला अहवाल देईल.

2. पेमेंट रोखले: संबंधित व्यवहारांशी निगडित ठेकेदारांना दिले जाणारे सर्व पेमेंट सध्या बँकेमार्फत तात्पुरते रोखण्यात आले आहे.

3. लेखा विभागाचे स्पष्टीकरण: दुसरीकडे, लेखा विभागाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. २४ मार्चच्या अंदाजपत्रक सभेनंतर उपसूचना उशिरा मिळाल्या, मात्र ३० मार्च रोजी त्यांची रीतसर छाननी करूनच कार्यवाही केल्याचा दावा विभागाने केला आहे.

शहराचे लक्ष अहवालाकडे

बजेटमधील तरतुदींना बगल देऊन आर्थिक व्यवहार झाल्याच्या या आरोपामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपसूचनांची प्रक्रिया नियमांनुसार झाली की त्यात खरोखरच ‘बोगस’ प्रकार घडला, हे आता सात दिवसांनंतर स्पष्ट होणार आहे. समितीच्या अहवालानंतर दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत शहरातील विविध विकासकामे व विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. 

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विविध केमिकल टाक्यांना सुरक्षा आवरण उभारणे व अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. २ मधील मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरात स्थापत्य विषयक कामे, नाल्यांची व पावसाळी चेंबर्सची साफसफाई तसेच चिखली-मोशी भागातील स्वच्छतागृहांची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. ९ मधील नेहरूनगर व खराळवाडी येथे स्थापत्य विषयक कामे तसेच प्रभाग क्र. २९ पिंपळे गुरव येथे रोड फर्निचर दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. १६ अंतर्गत रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, साईनगर, कोतवालनगर येथे रस्ते दुरुस्ती, महापालिका इमारती, स्मशानभूमी व इतर आवश्यक ठिकाणांची देखभाल-दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच रावेत येथील इंद्रप्रभा सोसायटी रस्त्यावर रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे महापारेषण कंपनीचे १३२ केव्ही क्षमतेचे दोन वीज मनोरे हलविण्यास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. १७ मधील महापालिका इमारती व इतर ठिकाणांची देखभाल-दुरुस्ती तसेच वाल्हेकरवाडी येथील रस्ते दुरुस्तीची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय ग, ड, ब, फ व ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध झोपडपट्टी परिसरांमध्ये (आदर्शनगर, मिलिंदनगर, शास्त्रीनगर, सुभाषनगर, कैलासनगर, महात्मा गांधीनगर, इंदिरानगर, बलदेवनगर, संजय गांधीनगर, तापकीरनगर, आण्णाभाऊ साठे नगर,काळाखडक-म्हातोबानगर, वेताळनगर, विजयनगर, मोरयानगर, एम.बी. कॅम्प,नागसेननगर, भोईरनगर, संतोषनगर, दुर्गानगर, अजंठानगर, राजनगर, सम्राटनगर, सिद्धार्थनगर, मोरेवस्ती, गांधीनगर, बालाजीनगर, शांतीनगर) येथे स्थापत्य दुरुस्ती, गटार व स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे आदी कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.

महापालिका शाळा, दवाखाने व मुख्य प्रशासकीय इमारतीची देखभाल-दुरुस्ती व फर्निचर कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक शौचालयांची उच्चदाब पाण्याच्या फवाऱ्याद्वारे यांत्रिकी पद्धतीने व मनुष्यबळाच्या सहाय्याने दैनंदिन साफसफाई, देखभाल व किरकोळ दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली.

याशिवाय, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत GIS सक्षम ERP प्रणालीसाठी व्हर्च्युअल मशिन उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. आरोग्य विभागांतर्गत नवीन थेरगाव, जिजामाता, भोसरी, तालेरा रुग्णालय तसेच ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल येथे कार्यरत तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यास तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयांतर्गत शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालयासाठी उपकरण खरेदीस मंजुरी देण्यात आली.

संत तुकाराम महाराज संतपीठासाठी आवश्यक तरतूद वर्ग करणे, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सावित्रीबाई फुले उद्यानातील उर्वरित विद्युत कामे पूर्ण करणे, अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंतीनिमित्त तात्पुरती ध्वनी व प्रकाश व्यवस्था करणे तसेच प्रभागांतर्गत पाने-फुले-फळे-भाजीपाला स्पर्धा व इतर कार्यक्रमांसाठी तात्पुरती ध्वनीव्यवस्था, सीसीटीव्ही व प्रकाशयोजना करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहराचा नियोजित आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्याच्या दृष्टीने आजच्या स्थायी समिती बैठकीत विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. रस्ते, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि झोपडपट्टी भागांतील मूलभूत सुविधा यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करून नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंजूर कामे निश्चित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. – अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर ५२ कोटींचा डल्ला? मुख्य लेखा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये ५२ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केला आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी ठेकेदारांशी संगनमत करून, प्रशासकीय नियमांना केराची टोपली दाखवत कोट्यवधी रुपयांची बिले परस्पर अदा केल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

नेमके प्रकरण काय?

नुकतेच सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या अंदाजपत्रकामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नसताना सुमारे ७० पेक्षा जास्त कामांची बिले रात्रीतून काढण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ज्या विभागांची ही कामे होती, त्या विभागप्रमुखांना या प्रक्रियेची कोणतीही पुसटशी कल्पना नसल्याचे समोर आले आहे.

नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचा वापर

या घोटाळ्यासाठी ‘बोगस’ उपसूचनांचा आधार घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. सुमारे २० हून अधिक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन विविध ७० कामांना मंजुरी मिळवण्यात आली. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचा समावेश आहे. संबंधित नगरसेवकांकडे विचारणा केली असता, त्यांनी आपल्या प्रभागातील कामांसाठी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, मात्र या तांत्रिक प्रक्रियेबद्दल त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्य लेखा अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

या आरोपांवर बोलताना मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की: “उपसूचनांमध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाही. ही सर्व कामे संबंधित विभागांकडूनच प्रस्तावित होती. २०२६-२७ च्या कामांसाठी तरतूद असते आणि त्यावर लोकप्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या असल्यामुळे बिले मंजूर करणे क्रमप्राप्त होते. बैठकीला मी उपस्थित राहू शकलो नाही कारण आयुक्तांसोबत माझी दुसरी परिषद होती.”

फौजदारी कारवाईची मागणी

सभापती अभिषेक बारणे यांनी या प्रकरणाला ‘थेट दरोडा’ असे संबोधले असून, प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी या गंभीर प्रकरणात काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

सर्व सामान्यांच्या घराचे स्वप्न होणार साकार; पीएमआरडीएची आज सोडत

१०२९ सदनिकांसाठी ५३१७ अर्जदारांमध्ये चुरस; आकुर्डीत रंगणार सोहळा

पिंपरी-चिंचवड, दि. ८ (प्रतिनिधी) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या गृहप्रकल्पातील शिल्लक सदनिकांसाठीची बहुप्रतीक्षित सोडत आज, बुधवारी (ता. ८) जाहीर होणार आहे. आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर येथे सकाळी ११ वाजता ही सोडत प्रक्रिया पार पडणार असून, ५ हजार ३१७ पात्र अर्जदारांपैकी कोणाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पीएमआरडीएच्या पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ येथील गृहप्रकल्पातील एकूण १ हजार २९ सदनिका सोडतीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने अर्जदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सोडतीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज प्रत्यक्ष सोडत पार पडणार असल्याने प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

ही संपूर्ण सोडत प्रक्रिया ‘IHLMS 2.0’ या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाला पूर्णतः आळा बसणार असून, प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक राहणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सनियंत्रण समितीच्या देखरेखीखाली ही सोडत काढण्यात येणार आहे.

सोडत प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने अर्जदार आकुर्डी येथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या अर्जदारांसाठी ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित युट्यूब लिंक पात्र अर्जदारांना एसएमएसद्वारे पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, “नागरिकांच्या घराच्या स्वप्नांना आधार देण्यासाठी प्रशासन सज्ज असून, संगणकीय प्रणालीमुळे पूर्णतः पारदर्शक पद्धतीने ही सोडत होईल. अर्जदारांनी अधिकृत लिंकद्वारे किंवा प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून निकाल पाहावा,” असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

सोडतीचा तपशील :

• एकूण सदनिका : १,०२९

• पात्र अर्जदार : ५,३१७

• वेळ : सकाळी ११:०० वाजता

• स्थळ : आकुर्डी

नियोजनबद्ध कामकाजामुळे मालमत्ता कर वसुलीत विक्रमी वाढ; १८ विभागीय कार्यालयांचा गौरव

महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन; ‘अभय योजना’  महिला बचतगटांचा मोलाचा वाटा

नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात यंदा उल्लेखनीय वाढ झाल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. या यशामागे करसंकलन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अविरत परिश्रम आणि जबाबदारीची जाणीव महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याच वेळी २०२६-२७ या वर्षासाठी मालमत्ता कर बिल वाटप मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला बचत गटांना प्रशिक्षण देणारी कार्यशाळाही पार पडली.

कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, तसेच नगरसेविका सुलभा उबाळे, निकिता कदम, सारिका मासुळकर, नीता पाडळे आदींसह उपायुक्त सचिन पवार व जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

महापौर लांडगे म्हणाले, “महिलांच्या सहभागामुळे कर वसुलीत सकारात्मक वाढ झाली आहे. ‘अभय योजना’मुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सुमारे ७० हजार मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेतला. यंदा ५ लाखांहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन कर भरला, ही प्रशासनावरील विश्वासाची पावती आहे.” तसेच बचत गटातील महिलांना वर्षभर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी ‘सिद्धी’ अ‍ॅपच्या माध्यमातून कर प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाल्याचे सांगितले. “गेल्या तीन वर्षांत ६०० हून अधिक महिलांना या उपक्रमातून रोजगार मिळाला असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळाली आहे,” असे त्या म्हणाल्या.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी ९६१ कोटी रुपयांची वसुली ही केवळ आकडेवारी नसून महापालिकेची भक्कम कमाई असल्याचे नमूद केले. “महिलांच्या माध्यमातून बिल वाटप आणि ‘अभय योजना’ची प्रभावी अंमलबजावणी यामुळेच ही विक्रमी वसुली शक्य झाली,” असे त्यांनी सांगितले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १८ विभागीय कार्यालयांमध्ये ‘परफॉर्मर ऑफ द डे’सारख्या स्पर्धांमुळे कामात स्पर्धात्मकता वाढल्याचे सांगितले. बचत गटांच्या माध्यमातून कर बिल वाटप करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका देशातील एकमेव संस्था असल्याचा दावा त्यांनी केला.

कार्यक्रमात ‘अभय योजना’ प्रभावीपणे राबविल्याबद्दल उपायुक्त सचिन पवार यांचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रास्ताविक सचिन पवार यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

गाड्यांऐवजी भत्ता देण्याचा प्रस्ताव; महापालिकेच्या खर्चात मोठी बचत शक्य – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे

महापालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना शासकीय गाड्या देण्याऐवजी निश्चित भत्ता देण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत असून, यामुळे पालिकेच्या खर्चात मोठी बचत होऊ शकते, असा दावा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला.

सध्या एका पदाधिकारी किंवा अधिकाऱ्यासाठी महापालिकेची गाडी चालवताना मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे समोर आले आहे. चालकाचे वेतन साधारण २५ ते ६० हजार रुपये असून काही ठिकाणी ते ७० हजारांपर्यंत जाते. याशिवाय गाडीचे मेंटेनन्स २० ते २५ हजार रुपये आणि इंधन खर्च २५ ते ३० हजार रुपये असा एकूण मासिक खर्च सव्वा लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.

या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांनी स्वतःची गाडी वापरल्यास त्यांना दरमहा सुमारे ५० हजार रुपयांचा निश्चित भत्ता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला असून, तो मान्य करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे महापालिकेचा मोठा खर्च वाचणार असून अधिकाऱ्यांना स्वयंपूर्णतेने काम करण्याची मुभा मिळणार आहे. अंदाजानुसार, एका गाडीमागे जवळपास एक लाख रुपयांची बचत होऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि अधिकारी हा पर्याय स्वीकारल्यास पालिकेच्या तिजोरीवरील ताण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तथापि, हा लाभ सर्वांसाठी लागू नसून केवळ नियमानुसार पात्र वरिष्ठ अधिकारी — उपआयुक्त, क्षेत्रीय अधिकारी आणि इतर कार्यकारी अधिकारी — यांनाच ही सुविधा मिळणार आहे. इतर अधिकाऱ्यांना गाड्या किंवा भत्त्याचा लाभ दिला जाणार नाही.

दरम्यान, २०१७ नंतर अनेक अधिकाऱ्यांनी गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे पुन्हा ही योजना राबविताना प्रशासनाने स्पष्ट आणि पारदर्शक धोरण आखण्याची गरज व्यक्त होत आहे.

सध्या १८ ते १९ अधिकाऱ्यांनी भत्त्याचा पर्याय निवडला असून काही पदाधिकारी स्वतःच्या गाड्यांचा वापर करत आहेत. “गाडी की भत्ता” या निर्णयामुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनात मोठा बदल होण्याची शक्यता असून, त्याची परिणामकारकता येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

नागरिकांनी पिंपरी-चिंचवड शहराची स्वच्छता व सौंदर्य राखण्यासाठी सहकार्य करावे – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

शहर विद्रुपीकरणावर पालिकेचा ‘कडक’ बडगा; नियम मोडणाऱ्यांवरथेट कारवाई

पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य आणि शिस्त अबाधित राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स, फ्लेक्स तसेच सार्वजनिक भिंतींवर होणाऱ्या जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने अशा प्रकारांवर कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

महापालिका हद्दीत ठिकठिकाणी उभारण्यात येणारे बेकायदेशीर फलक, दूरध्वनी खांब, महावितरण डीपी आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे. ही समस्या आटोक्यात आणण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि बीट निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आढळणारे अनधिकृत फलक त्वरित हटवण्याबरोबरच संबंधित जाहिरातदारांना नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय, जाहिरातींवर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकांच्या आधारे संबंधितांशी संपर्क साधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि इतर लागू कायद्यांनुसार दंड वसूल केला जाईल. तसेच फलक हटवण्याचा खर्चही संबंधितांकडून वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीला आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

“नागरिक आणि जाहिरातदारांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करणे गरजेचे आहे. अनधिकृत फलक व बॅनर्स लावणे टाळावे, अन्यथा तात्काळ कारवाई करण्यात येईल,” — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

महावितरण आकुर्डीचा भोंगळ कारभार; सहा दिवस ग्राहक अंधारात

आकुर्डी येथील महावितरण कार्यालयाच्या निष्काळजी कारभाराचा गंभीर प्रकार समोर आला असून, तब्बल सहा दिवस एका व्यावसायिक ग्राहकाला अंधारात ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यामुळे संतप्त ग्राहकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत संताप व्यक्त केला आहे.

आकुर्डीतील केएसबी चौक परिसरात ‘पूनम सेल्स कॉर्पोरेशन’ या नावाने व्यवसाय करणाऱ्या ग्राहकाचा गेल्या सहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित ग्राहकाने अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार करत जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच, सहा दिवसांच्या नुकसानीपोटी सुमारे ६० हजार रुपयांची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा संबंधित ग्राहकाने दिला आहे. या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

याशिवाय, महावितरणकडे मनुष्यबळ व आवश्यक साहित्याचा तुटवडा असल्याची बाबही समोर येत आहे. अनेक कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप असून, ऑनलाइन नाव बदल प्रक्रियेतही टेबलखालून पैसे दिल्याशिवाय अर्ज नाकारले जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या सर्व प्रकाराबाबत पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननेही आकुर्डी उपविभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.