Sunday, January 18, 2026
Homeताजी बातमीनववर्षांच्या शुभेच्छा देताना तुका म्हणे या शब्दांचा वापर केल्यास संस्थान कठोर कारवाई...

नववर्षांच्या शुभेच्छा देताना तुका म्हणे या शब्दांचा वापर केल्यास संस्थान कठोर कारवाई करणार, देहू संस्थानचा कारवाईचा इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अवमान आणि अपमान होईल अशा अनेक घटना घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. महाराष्ट्रातील संत परंपरा, महापुरुष यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य होत आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यानं निर्माण झालेला वाद ताजा आहे. दुसरीकडे आज भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या एका वक्तव्यानं देखील वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील संत परंपरा, महापुरुषांच्या सन्मानासाठी संत तुकाराम महाराज, देहू संस्थान पुढं आलं आहे. आगामी काही दिवसांमध्ये नववर्षांच्या शुभेच्छा देताना तुका म्हणे या शब्दांचा वापर केल्यास संस्थान कठोर कारवाई करणार आहे.

आपण दर वर्षी सरत्या वर्षीला निरोप देताना सोशल मीडियावर “तुका म्हणे” असा शब्द प्रयोग करून अनेक मेसेज व्हायरल करत असतो. दरवर्षी अशा आशयाचे शुभेच्छा, मित्र परिवार आणि आप्तेष्टांना देऊन महाराष्ट्रातील संतांचा अपमान केला जातो. त्यामुळेच देहू संस्थानने आता याबाबत कडक पावले उचलली आहेत. देहू संस्थानच्या विश्वस्तांनी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना इशारा दिला आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छांचे मेसेज देताना किंवा मेसेज व्हायरल करताना यापुढे काळजी घ्यावी लागणार आहे. कारण अशा मेसेजवरून कडक कारवाई देखील केली जाणार आहे, अशी माहिती देहू संस्थानने दिली आहे. संत तुकाराम महाराज आणि इतर महापुरुषांचा अपमान होऊ नये यासाठी देहू

देहू संस्थानाच्यावतीनं नव वर्षासाठी शुभेच्छा देताना “तुका म्हणे” हा शब्दप्रयोग केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केवळ संत तुकाराम महाराज यांच्या “तुका म्हणे” या शब्दाचे विडंबन केल्यावरच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह; महाराष्ट्रात असणाऱ्या संत, महापुरुष यांचा वापर केल्यास आणि विडंबन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे यांनी दिला आहे.

अशा प्रकारच्या शुभेच्छांमुळं महापुरुषांची बदनामी होतेच. परंतु, त्यावर मोठ्या प्रमाणावर विडंबन देखील केली जातात. त्याचा त्रास संस्थानाला अनेकदा सहन करावा लागतो. त्यामुळे महापुरुष आणि संतांची नावे वापरुन कोणताही मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल करु नये, असं आवाहन देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments