आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्त १० लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. गुरुवारी २९ जून रोजी आषाढी एकादशीनिमित्त देशभरात उपवास, पुजा-अर्चा यांसह दर्शनासाठी राज्यभरातील विठ्ठल मंदिरं सजली आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून मंदिराची, मूर्तींची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.यंदा राज्यातील युती सरकारला एक वर्षे पूर्ण होत असून गेल्या वर्षभरात अनेक विघ्न अडचणी आल्या मात्र विठुरायाच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरळीतपणे करता येणे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.पंढरपूर मंदिराच्या विकास आराखड्याबाबत सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.
महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रम करण्यात आला.

पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी 109 कोटी तर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी 108 कोटी रुपये मंजूर केल्याचे यावेळी जाहीर केले.