वडिलांनी आपल्याच लहान मुलीची ब्लेडने गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. पतीसोबत झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी पत्नी पोलिसात गेली असताना पतीने मुलीची हत्या केली. दोन वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. नागपुरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपुरात राहणाऱ्या सयाम दाम्पत्यामध्ये काही कारणाने वाद झाला. या वादाची तक्रार देण्यासाठी पत्नी पोलीस स्टेशनला गेली होती. त्याचा राग आल्यामुळे पतीने चिमुकलीची हत्या केल्याचा आरोप आहे. राधिका किशोर सयाम असं मृत्युमुखी पडलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचं नाव आहे.
नागपूर जिल्ह्यातील गणेशपूर गावात ही धक्कादायक घटना घडली. बुट्टीबोरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.