जगभरातील लोकसंख्येच्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशनच फंडचा (UNFPA) अहवाल अलीकडेच समोर आला आहे. त्यात भारताने लोकसंख्येतबाबतीत चीनला मागे टाकल्याचं सांगितलं आहे. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२८ दशलक्ष झाली आहे. तर, चीनची लोकसंख्या १४२५ दशलक्ष एवढी आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं एक विधान समोर आलं आहे.
“तीन अपत्ये असलेल्या खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं,” अशी मागणी अजित पवारांनी केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे. ते बारामतीतील एका कार्यक्रमात बोलत होते.