८ फेब्रुवारी २०२१,
राज्यात एकीककडे 26 मार्च रोजी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केलं जात असताना दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनसुद्धा आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे या संमेलनाचे निमंत्रण दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांना देण्यात आलं आहे. थनबर्ग यांना निमंत्रण दिल्यामुळे या साहित्य संमेलनाची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
यावेळी बोलताना राजू देसले यांनी सांगितले की, “आम्ही संविधानाची मूल्ये माणणारे आहोत. मराठी साहित्य संमेलनाला सरकारने 50 लाख रुपये दिले आहेत. आमच्यामुळे त्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. एक मूठ धान्य आणि 1 रुपया जमा करुन आम्ही साहित्य संमेलन आयोजित करतोय. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनास अडचण निर्माण नाही.
दरम्यान, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला जाहीरपणे बाठिंबा दिल्यानंतर देशात खळबळ उडाली होती. ग्रेटा यांच्या भूमिकेचे काहींनी समर्थन केले होते. तर काहींनी ग्रेटा यांना जाहीरपणे विरोध करत देशांतर्गत प्रश्नांमध्ये नाक न खुपसण्याचा सल्ला दिला होता. भारतरत्न तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यानेसुद्धा “भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे,” असं ट्विट करत ग्रेटाला अप्रत्यक्षपणे सुनावलं होतं. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत ग्लोबल सेलिब्रिटिजचे ट्वीट म्हणजे भारताविरोधातील एक विचारपूर्वक रचण्यात आलेला कट असल्याचं दिसून आलं होतं. त्याचे काही पुरावेही मिळाले होते. या पार्श्वभूमीवर भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गविरोधात 4 फेब्रुवारी रोजी FIR दाखल केली होती.