Wednesday, May 14, 2025
Homeअर्थविश्वभारताचा पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे एअर स्ट्राईक, पाकमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त…

भारताचा पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे एअर स्ट्राईक, पाकमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त…

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला काय उत्तर देणार याकडे जगाचं लक्ष लागलं होतं. ज्यानंतर एका गुप्त मोहिमेच्या अंतर्गत एअर स्ट्राईक केला आहे. भारतीय सैन्य दलानं जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये नऊ ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला.

या ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक..

१) बहावलपूर

२) मुरिदके

३) गुलपूर

४) भीमबर

५) चक अमरु

६) बाग

७) कोटली

८) सियालकोट

९) मुजफ्फराबाद

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments