दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर आता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीनं भाष्य करण्यात आलं आहे. सरकार आणि आंदोलकांनी जास्तीत जास्त संयम बाळगावा असं आवाहन मानवी हक्क आयोगानं केलं आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मानवी हक्क आयोगाकडून दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करण्यात आलं आहे. या संघटनेनं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “आम्ही सरकार तसेच शेतकरी आंदोलकांनी शक्य तितका संयम बाळगावा असं आवाहन करतो. शातंतापूर्वक एकत्र येण्याचा अधिकार तसेच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने व्यक्त होणाच्या अधिकाराचे संरक्षण झालं पाहिजे. सगळ्यांकरीता मानवी हक्कांच्या दृष्टीने समाधानाचा मार्ग काढणं महत्वाचं आहे.”
हेही वाचाः डिजिटल पेमेंट सर्व्हिसेस तक्रारींसाठी एकच नंबर, आरबीआयची घोषणा
या आधी पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलिफा यांनीही दिल्ली आंदोलनावर भाष्य केलं होतं. अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनाच्या वतीनंही दिल्ली आंदोलनावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेने भारत सरकारच्या नव्या कृषी कायद्याचं समर्थन केलं आहे. परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांना इंटनेटची सुविधा द्यावी, ती बंद करु नये असाही सल्ला देण्यात आला आहे.