Monday, May 12, 2025
Homeउद्योगजगतवीज ग्राहकांना दिलासा! वीज नियामक आयोगानं घेतला मोठा निर्णय, १ एप्रिलपासून लागू...

वीज ग्राहकांना दिलासा! वीज नियामक आयोगानं घेतला मोठा निर्णय, १ एप्रिलपासून लागू होणार

आधीच कोरोनाने हतबल झालेल्या सर्वसामान्यांना वीज नियामक आयोगानं आज मोठा दिलासा दिला आहे. वीज दरात जवळपास २ टक्के कपात करण्याचे आदेश आयोगाने वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. ही दर कपात १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. कोरोना काळातील वीज बिलावरून सर्वसामान्यांमध्ये खूप नाराजी पसरली होती. याच मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चर्चा करण्यात आली होती. या सर्वांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.

राज्य वीज नियामक आयोगानं दर कपातीचा निर्णय घेतला असून, तसे आदेश वीज वितरण कंपन्यांना दिले आहेत. वीज नियामक आयोगानं इंधन समायोजन कर (एफएसी) फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश वीज कंपन्यांना दिले आहेत. आयोगाच्या आदेशानुसार महावितरण, बेस्ट, टाटा, अदाणी या वीज कंपन्यांच्या वीज दरात सरासरी २ टक्क्यांची कपात केली जाणार आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील वीज ग्राहकांचे वीजदरही निश्चित केले आहेत. आयोगाने पुढील पाच वर्षांसाठीच्या वीज दर जाहीर केले. या निर्णयानुसार महावितरणच्या घरगुती वीजबिलात १ टक्के कपात केली आहे. त्यामुळे युनिटमागे ग्राहकांना ७.५८रुपये द्यावे लागणार आहे. अदाणी कंपनीची वीज घेणाऱ्या ग्राहकांना ०.३टक्के वाढ लागू केली असून, प्रत्येक युनिटसाठी ग्राहकांना ६.५३ रुपये मोजावे लागणार आहे. तर बेस्टच्या ग्राहकांना ०.१ टक्के वाढीनुसार युनिटमागे ६.४२रुपये द्यावे लागणार आहे. टाटा पॉवरच्या वीजदरात १ एप्रिलपासून ४.३ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. आयोगाने दरवाढीला मंजुरी दिली असून, ‘टाटा’च्या ग्राहकांना प्रति युनिट ५.२२ रुपयांची अधिकची झळ बसणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments