दिल्लीत सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणी दिल्ली न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खान याला मृत्यूदंड सुनावला आहे.
न्यायालयाने शिक्षेचा सुनावणीचा निर्णय सायंकाळी ४ वाजेपर्यंत राखून ठेवला होता. पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आरिझ खानला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती.
हेही वाचाः Corona News: महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात येणाऱ्यांना एका आठवड्याचे सक्तीचे विलगीकरण