मुंबई : राज्यातील करोनाबाधितांचा आलेख घसरणीला लागला असून शुक्रवारी गेल्या तीन महिन्यांतील सर्वात कमी म्हणजे १४ हजार १५२ नवीन बाधितांची नोंद झाली, तर २० हजार ८५२ रुग्णांनी करोनावर मात केल्याने राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.८६ टक्के झाले आहे. बाधितांचा आकडा घटत असला तरी मृत्यूचे प्रमाण अजूनही अधिक असून दिवसभरात २८९ जणांचा मृत्यू झाला.
सध्या राज्यात एक लाख ९६ हजार ८९४ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यभरात १४ लाख ७५ हजार ४७६ व्यक्ती गृह अलगीकरणात तर ७ हजार ४३० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १५३७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्या खालोखाल कोल्हापूरमध्ये ११५९ तर सांगली ७७८, रायगडमध्ये ६१८, मुंबईत ९६८, नाशिक ३६६ बाधितांची नोंद झाली.