Thursday, May 15, 2025
Homeताजी बातमीभारतरत्न देण्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद; नाना पटोले म्हणाले...

भारतरत्न देण्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद; नाना पटोले म्हणाले…

महाराष्ट्राच्या अर्थसंल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी महाविकासआघाडी पक्षातील शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात भारतरत्न देण्याच्या मागणीवरून मतभेद असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेने हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. यानंतर एक दिवसाने महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी आपली भूमीका मांडली. त्यांनी सांगितले की, शिवसेनेची भूमिका ही आमची भूमिका नाही. तसेच “सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न बहाल करण्यात यावा. भारतरत्न प्रदान करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, राज्य सरकारची समस्या नाही, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला विचारले होते की, केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? तसेच भाजपाने आपल्या पूर्वीच्या मित्रपक्षाला हिंदुत्व शिकवू नये. सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी केंद्राकडे दोनदा पत्र पाठविले होते. भारतरत्न कोणाला देतात? पंतप्रधान आणि समितीचा हा हक्क आहे. वीर सावरकरांबद्दल शिवसेनेने कधीही आपली भूमिका बदलली नाही, असे ठाकरे म्हणाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments