Thursday, May 15, 2025
Homeअर्थविश्वपुण्यातील ओशो आश्रमातील भूखंड विक्रीला काढले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस

पुण्यातील ओशो आश्रमातील भूखंड विक्रीला काढले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस

६ मार्च २०२१,
पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कोरोनामुळे आश्रम आर्थिक अडचणीत आल्यामुळे भूखंड विकायचा निर्णय घेतल्याचा दावा ओशो आश्रमाच्यावतीने करण्यात आलाय. दरम्यान ओशो यांच्या भक्तगणांनी मात्र या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त केलाय.

झुरिचमधील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन यांची मालकी असलेल्या कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमचा परिसर विस्तीर्ण आहे. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात ओशो आश्रमातील ध्यानकेंद्र बंद करण्यात आले. आर्थिक संकटाचे कारण पुढे करीत ओशो आश्रमाच्या व्यवस्थापनाने एक एकराचे दोन भूखंड प्रसिद्ध उद्योजक आणि बजाज ऑटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव राहुलकुमार बजाज यांना १०७ कोटी रुपयांना विकण्याचे ठरविले आहे. आश्रमाला लागून बजाज यांचा प्रासादतुल्य बंगला आहे. भूखंड विक्रीची कुणकुण लागल्यानंतर ओशो फ्रेंडस फाउंडेशनने या प्रक्रियेला विरोध केला आहे.

जानेवारी महिन्यात ओशो आश्रमाच्या व्यवस्थापनाने म्हणजेच ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनने मुंबईतील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे भूखंड विक्रीची परवानगी एका अर्जाद्वारे मागितली होती. त्यावर भूखंड विक्रीस मनाई करण्यात यावी, असा अर्ज ओशो फ्रेंडस फाउंडेशनने धर्मदाय आयुक्त कार्यालयात केला आहे. याबाबत ओशो फ्रेंडस फाउंडेशनचे सदस्य योगेश ठक्कर म्हणाले, भूखंड विक्रीस मनाई करण्यात यावी, असा अर्ज आम्ही केला आहे. या अर्जावर मुंबईतील धर्मदाय आयुक्त कार्यालयात १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

याबाबत ओशो आश्रमाच्या प्रवक्त्या माँ अमृता साधना यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही भाष्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले. ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, ‘ भविष्यात ओशो आश्रमातील ध्यानकेंद्र पुन्हा सुरू करण्यात येईल. मात्र, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भूखंड विक्री करावी लागत आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments