महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून राज्याच्या राजकारणावर काँग्रेस पक्षाचा प्रदीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. हा प्रभाव सामाजिक, राजकीय, सहकारी, सांस्कृतिक आणि अर्थविषयक सर्व संस्थांवर होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर आणि 2014 साली केंद्रासह राज्यात सत्तांतर झाल्यापासून हे चित्र बदलल्याचं दिसतं.
एकेकाळी राज्याच्या सर्व सत्ताकेंद्रात आणि निर्णयप्रक्रियेत अग्रभागी असणारा पक्ष आज मागेमागे पडत चालल्याचं दिसतं.


