Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीटीम इंडियाचा बांगलादेशवर आठ विकेट्स राखून विजय

टीम इंडियाचा बांगलादेशवर आठ विकेट्स राखून विजय

८ नोव्हेंबर
बांगलादेशनं या सामन्यात भारतासमोर १५४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण रोहितच्या ८५ धावांच्या खेळीमुळे टीम इडियानं हे आव्हान चेंडू आणि आठ विकेट्स राखून पार केलं. रोहितच्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता.
बांगलादेशनं या सामन्यात भारतासमोर १५४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण रोहितच्या ८५ धावांच्या खेळीमुळे टीम इडियानं हे आव्हान १५.४ षटकांत सहजरित्या पार केले.
राजकोट टी-२० मधील विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दिल्लीत झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता. टी-२० त बांगलादेशकडून झालेला भारताचा हा पहिलाच पराभव होता. या पराभवाची सव्याज परतफेड आज भारताने केली. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना नागपुरात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रविवारी होणार असून या सामन्यात विजयी होणारा संघ मालिकेत बाजी मारणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments